akola news The closure of the market committee hit the farmers 
अकोला

बाजार समित्या बंदचा शेकऱ्यांना फटका, शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ

सुनीलकुमार धुरडे

दानापूर (जि.अकोला)  ः कोरोना विषाणू संसर्गाने वर्ष उलटल्यानंतरही त्याची धग कायम आहे. लॉकडाउनच्या नावानेही आता अंगावर काटा उभा राहतो. वर्षभरानंतरही या संकटातून सावरू शकलो नाही. आता तर कोविड विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या व ग्रामीण भागातील बाजार बंद आहेत. त्याचा फटका शेवटी भाजीपाला उत्पादकांना बसला आहे.

घामा गाळून पिकवलेला भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. दानापूर परिसरातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात पिकविलेली वांगी गुरांना खाण्यासाठी टाकल्यानंतर लॉकडाउनचा परिणाम किती भयावह आहे याचा प्रयत्य आला.


जिल्ह्यात अंशतः लॉकडाउन सुरू आहे. बाजार समित्या व आठवडी बाजार बंद आहेत. कोरोनाचा प्रभाव वाढतच असल्याने आणखी काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम आता ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत. तेल्हारा तालुक्यातील दानापूर व परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाउनच्या चांगलाच फटका बसला आहे. बाजार समितीच्या व ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंदीमुळे काढलेला माला व्यापारी खरेदी करायला तयार नाही. २५० ते ३०० रुपये प्रति १८ किलो विकल्या जाणारी वांगी अवघ्या २० ते ३० रुपयाला विकावी लागत आहे. त्यातून बाजारापर्यंत नेण्याचा खर्च तर दूरच भाजीपाला उत्पादनासाठीचा खर्चही निघत नसल्याने दानापूर येथील शेतकरी सुरेश पिलात्रे यांनी त्यांच्या शेतात पिकविलेली ही वांगी गुरांना खावू घालण्यासाठी टाकली.
..........................
बाजारासोबतच लग्नसराई बंद
कोरोना विषाणू संसर्गाची लाट सुरू होण्यापूर्वी वांगी २५० ते ३०० रुपये प्रती १८ किलो विकली जात होती. गेले दोन हंगामात मात्र वर्षाचा ताळेबंद पार बिघडला आहे. एका एकरात १.५० ते १.७५ लाखाचे नुकसानाला भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील बाजार व बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे वांगी २० ते ३० रुपये किलो विकल्या जात आहे. ग्रामीण भागातील भाजीपाला उत्पादकांना उन्हाळ्यात लग्न समारंभाचा आधार मिळतो. मात्र, त्यावरही प्रतिबंध आले. मर्यादित स्वरुपात समारंभ होत असल्याने भाजीपाल्याला ना व्यापारी विकत घेत आहे, ना नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
........................
मी दोन एकर क्षेत्रावर वांगी पिकांची मल्चिंगवर लागवड केली आहे. मला याकरिता ६० ते ७० हजार रुपये खर्च आला आहे. दोन वर्षांआधी याच महिण्यात वांग्याला १८ ते २० किलोला २५० ते ३०० रुपयांचा भाव मिळत होता. मात्र बाजारपेठ व ग्रामीण भागातील बाजार बंद असल्याने भावात मोठी घट झाली आहे. त्यामुळे लागलेला खर्च ही निघेल की नाही यात शंका आहे.
सुरेश पिलात्रे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, दानापूर

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक; बीडमध्ये आज विराट मोर्चा

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT