Shreyas Iyer captaincy chances in second T20 team India
esakal
Why BCCI planning two Indian T20 teams at same time? भारतात प्रतिभावान खेळाडूंची कमी नाही आहे, त्यामुळेच भारत एकाचवेळी दोन संघ मैदानावर उतरवण्याच्या तयारीत आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधून अनेक प्रतिभावान खेळाडू घडत आहेत आणि त्यामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. BCCI एकाच वेळी दोन ट्वेंटी-२० संघ मैदानावर उतरवण्याची योजना आखत आहे आणि त्यासाठी ३०-३५ खेळाडू शॉर्टलिस्ट केल्याचे वृत्त समोर आले आहे. यापैकी एका संघाचे नेतृत्व पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.