crime  esakal
अकोला

Akola: ठाणेदारावर शेतकऱ्याला मारहाणीचा आरोप, पीडिताच्या पत्नीची गृहमंत्र्यांकडे तक्रार; जखमीवर उपचार

शेतीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

पातूर (जि.अकोला) - पातूर तालुक्यात चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा येथील सुभाष इंगळे या शेतकऱ्याला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून ठाणेदाराने मारहाण केल्याची तक्रार पीडित शेतकऱ्याच्या पत्नीने गृहमंत्र्यांकडे केली आहे. शेतीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पिंपळखुटा येथील मंगला सुभाष इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रशांत शेषराव वानखडे व मिलींद शेषराव वानखडे, भाऊराव बळीराम वानखडे यांनी त्यांना अश्लिल शिविगाळ केली व विनयभंग केल्या. याबाबत ठाणेदार विपुल पाटील यांच्याकडे तक्रार दिली असता त्यांनी स्वीकारली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय त्यांचे पती सुभाष इंगळे यांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून ठाणेदाराने मारहाण केल्याचेही नमुद आहे.

शेतीच्या वादातून सुभाष बळीराम इंगळे यांना ही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमुद आहे. जखमी सुभाष यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही तक्रार गृहमंत्र्यांसोबतच पोलिस महासंचालक व पोलिस अधीक्षकांनाही देण्यात आली आहे.

शेतीच्या वादातून तक्रार

सुभाष इंगळे यांचे पिंपळखुटा येते शेत आहे. त्यांचे शेत दिवांग शेतकरी प्रशांत शेषराव वानखडे (३३) यांचा शेताला लागून आहे. याच शेतीवरून वाद झाला व जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची तक्रार वानखडे यांनी चान्नी पोलिस स्टेशनला ता. २५ ऑगस्ट रोजी दिली होती.

त्यावरून पोलिसांनी सुभाष इंगळे यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, २९४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक १९९८ कलम ३ (२)(व्हीए) व दिव्यांग व्यक्ती अधिकारी अधिनियम २०१६ चे कलम ९२(बी), ९२ (एफ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली दखल

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी सोमवारी या प्रकरणाची दखल घेवून शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाबाबत चान्नी पोलिस स्टेशनच्या ठाणेदारासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ठाणेदार विपुल पाटील यांनी शेतकऱ्याला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून पैशाची मागणी केली व तुझ्या विरुद्ध तक्रार असल्याचे सांगितले. शेतकऱ्याला अर्धनग्न करून मारहाण केली व खोटे गुन्हे  दाखल  केल्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

संबंधित शेतकऱ्यावर ता. २५ ऑगस्ट रोजी गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाले तेव्हापासून आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत. माझ्यावर कोणी काहीही आरोप घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही. मी कायद्याची बाजू घेऊनच काम करत आहे.

- विपुल पाटील, ठाणेदार पोलिस स्टेशन, चान्नी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT