अकोला - जिल्ह्यात १ जून ते १४ जुलैपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २ हजार १४९ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. त्यासोबतच ४७ घरांचेही नुकसान झाले. सात जनावरांचाही पावसाळी स्थितीमुळे मृत्यू झाला. तसेच गत दाेन दिवसात बाळापूर तालुक्यातील ७७४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येत असून ते दुथडी भरून वाहत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जाेर धरला असून, काही भागात अतिवृष्टी हाेत आहे. त्यातच अकोला व बाळापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी व नाल्याच्या काठी वस्ती असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले.
नाल्यांचे पाणी शेतातही शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यासंबंधिच्या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी व महसूल विभागामार्फत करण्यात येत आहे. अंतिम सर्वेक्षण झाल्यानंतर संबंधितांना नुकसान भरपाई मिळेल.
असे झाले नुकसान
बाळापूर व अकाेला तालुक्यात २७ जून राेजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून गेली. एकूण १ हजार २६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अकोला तालुक्यात ८५० हेक्टर क्षेत्रावरील आणि बाळापूर तालुक्यात ४२५ हेक्टर आर. क्षेत्रावरील पिकांची हानी झाली हाेती.
७ जुलै राेजी पावसामुळे याच दाेन तालुक्यातील ८६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली. बाळापूर तालुक्यात १३ व १४ जुलै राेजी झालेल्या पावसाचा ७७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.