अकोला

अकरा रेल्वे गाड्या रद्द; प्रवाशांना फटका

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान सदर निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने ११ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचा फटका मात्र आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.

लॉकडाऊननंतर मिशन बिगीन अगेन अंतर्गत रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्या सुरू केल्या होत्या. परंतु केवळ आरक्षित तिकीट घेवून जाणाऱ्यांनाच प्रवास करता येऊ शकत होते. उत्सव विशेष व इतर रेल्वे गाड्या सुरू झाल्यामुळे रेल्वे मध्ये पुन्हा एकदा प्रवाशांची वर्दळ वाढली होती. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ११ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचा फटका स्थानिक प्रवाशांना बसत आहे.

दरम्यान रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०२०४१ पुणे -नागपूर विशेषच्या फेऱ्या २९ एप्रिलपर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०२०४२ नागपूर-पुणे विशेषच्या फेऱ्या ३० एप्रिलपर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०२२३९ पुणे-अजनी विशेषच्या फेऱ्या १ मे २०२१ पर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०२२४० अजनी-पुणे विशेषच्या फेऱ्या १८ एप्रिल २०२१ पासून २ मे पर्यंत रद्द राहतील.

गाडी क्रमांक ०२११७ पुणे-अमरावती विशेषच्या फेऱ्या २१ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०२११८ अमरावती-पुणे विशेषच्या फेऱ्या २२ एप्रिलपासून २९ एप्रिल पर्यंत रद्द राहतील.ग गाडी क्रमांक ०२०३६ नागपूर-पुणे विशेषच्या फेऱ्या १७ ते १ मे पर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०२०३५ पुणे- नागपूर विशेषच्या फेऱ्या २९ एप्रिलपर्यंत रद्द राहतील.

गाडी क्रमांक ०११३७ नागपूर-अहमदाबाद विशेषच्या फेऱ्या २१ ते २८ एप्रिलपर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०११३८ अहमदाबाद-नागपूर विशेषच्या फेऱ्या २२ ते २९ एप्रिलपर्यंत रद्द राहतील. गाडी क्रमांक ०२२२३ पुणे-अजनी विशेषच्या फेऱ्या २३ ते ३० एप्रिलपर्यंत रद्द राहतील.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT