Bachchu Kadu  sakal
अकोला

Bachchu Kadu : बंद दाराआड नाही, मैदानात उमेदवारी देतो...कारंजात बच्चू कडू यांनी दिले महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत

Bachchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांनी कारंजा येथील सभेत महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले. त्यांनी जय बेलखोडे यांची आर्वी विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली, भाजपसमोर आव्हान उभे करत मैदानात लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

कारंजा (घाडगे) (जि. वर्धा) : प्रहार असा पक्ष आहे जो मैदानात सर्वांसमोर उमेदवारी जाहीर करतो. हा पक्ष बंद दाराआड उमेदवारी जाहीर करत नाही. सत्ता बदलात तिसऱ्या आघाडीला महत्त्व आहे. हे संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी विसरू नये, असा टोला माजी मंत्री बच्चू कडू यांनी येथील सभेत देत महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले.

येथील आठवडी बाजार परिसरात शनिवारी (ता. २८) प्रहारचा मेळावा आयोजित होता. यावेळी ते बोलत होते. या सभेला पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत माजी मंत्री बच्चू कडू यांनी जय बेलखेडे यांची आर्वी विधानसभेकरिता उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या आर्वी विधानसभेत त्यांनी शंख फुंकला. त्यांचा उमेदवार रिंगणात आल्याने आर्वी विधानसभेत चुरशीची लढत होणार आहे. २८८ नाही तर १० आमदार जरी प्रहारचे महाराष्ट्रात निवडून आले तरी मुख्यमंत्री गणपती केल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.

आम्ही सध्या एकटेच आहो. तरी सुद्धा विधानसभेमध्ये तुमचा आवाज उचलत राहतो. माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आहे. सर्वसामान्यांसाठी आणखी गुन्हे वाढले तरी हरकत नाही. ११५ वेळा मी रक्तदान केले. कोण्या राजकीय नेत्याने केले का? असा सवालही त्यांनी केला. यावेळी त्यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश झाला.

प्रहारची महाराष्ट्रातील पहिली उमेदवारी जाहीर

कारंजा येथे झालेल्या सभेत बच्चू कडू यांनी आर्वी विधानसभेकरिता जय बेलखोडे यांची उमेदवारी जाहीर केले. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपची येथे सत्ता आहे. ही उमेदवारी प्रहारची महाराष्ट्रातील पहिली ठरली. बच्चू कडू यांनी केवळ उमेदवारी जाहीर केली नाही तर निवडून आणण्याचीही हमी दिली.

अब हमारा राज आयेगा

संजय राऊत बोलले तिसरी आघाडी म्हणजे पैसे खाणारी आघाडी. संजय राऊत आणि जयंत पाटील यांना सांगतो जेव्हा शरद पवार काँग्रेस मधून फुटले तेव्हा राष्ट्रवादी तिसरी होती विसरू नका. जेव्हा भाजप आणि काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना तिसरी होती. दिल्ली मध्ये केजरीवाल निवडून आले तेही तिसरेच होते. ममता बॅनर्जी तिसरीच होती, अब हमारा राज आयेगा ओ भी तिसरा होगा, असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT