Water Resources Minister Jayantrao Patil and Guardian Minister Bachchu Kadu have promised to solve the problem of forest water in Telhara taluka 
अकोला

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली जलसंपदा मंत्री, पालकमंत्र्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (अकोला) : तालुक्यातील वान धरणातील पाण्याची आधीच अनेक योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उचल झालेली आहे व आता अमृत योजना अकोला २४ द.ल. घ.मी. व बाळापूरच्या योजनेसाठी ३.३५ द.ल. घ.मी. पाणी आरक्षित करण्याचा आदेश शासनाने काढला आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा व धरणातील पाणी तालुक्यातील शेतीचे सिंचनासाठी आरक्षित करण्यात यावे, या मागणीसाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने बुधवार, (ता. १६) डिसेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयात जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. या भागातील शेतकऱ्यांवर कसा अन्याय होत आहे याबाबत आपली बाजू मांडली असता त्यांनी शेतकऱ्यांचे सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

वाण धरणातील शेतकऱ्यांचे सिंचनाकरिता पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण सोडून अमृत योजनेचे व्यतिरिक्त फक्त २० द.ल.घ.मी. पाणी धरणामध्ये शिल्लक राहते. त्यामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशाला बाधा पोहचत असून, सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध वान पाणी बचाव संघर्ष समितीने (ता.०३) जानेवारीपासून वान धरणावर बेमुदत आंदोलन करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. जलसंपदामंत्री जयंतराव पाटील अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या सदर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. सिंचनाबाबत या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असे सांगितले. यावेळी तेल्हारा तालुक्यातील १५ ते २० शेतकऱ्यांचे शिष्टमंडल उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

Satara fraud:'बहुलेतील एकाची १३ लाखांची फसवणूक'; बनावट कागदपत्रांद्वारे माेटारीची विक्री, सहा जणांवर गुन्हा

Nagpur Crime: नागपुरात कचरा गाडी चालकाचा खून, जुन्या वादातून घडली घटना...

SCROLL FOR NEXT