Adani Group 
अर्थविश्व

अदानी ग्रुप आता माध्यम क्षेत्रात; संजय पुगालियांकडे जबाबदारी

पुगालिया यांनी यापूर्वी क्वींट डिजिटल मीडियाच्या अध्यपदी कार्यरत होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतातील बडा उद्योग समुह असलेला अदानी ग्रुप आता माध्यम क्षेत्रात प्रवेश करणार आहे. यासाठी वरिष्ठ पत्रकार संजय पुगालिया यांच्यावर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुगालिया यांची अदानी एन्टरप्रायझेसमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तसेच ग्रुपच्या नव्या माध्यम उपक्रमामध्ये 'एडिटर इन चीफ' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पुगालिया हे क्वींट डिजिटल मीडिया लिमिटेडच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाले होते.

अदानी कंपनीच्या अंतर्गत निवेदनाद्वारे पुगालिया यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. पुगालिया यांना राजकीय आणि बिझनेस पत्रकारितेचा मोठा अनुभव आहे. क्वींटमध्ये येण्यापूर्वी त्यांनी यापूर्वी CNBC आवाज, टीव्ही १८ आणि CNBC या हिंदी बिझनेस वृत्तवाहिनीत मध्ये मुख्य संपादक म्हणून काम केलं आहे.

संजय पुगालिया यांच्या नियुक्तीची घोषणा करताना अदानी ग्रुपनं म्हटलं की, "अदानी समूहाच्या विविध व्यवसायांमध्ये आणि राष्ट्र उभारणीच्या आमच्या उपक्रमांमधील मीडिया, कम्युनिकेशन आणि ब्रँडिंगमध्ये पुगालिया यांच्या व्यापक अनुभवाचा लाभ घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत"

पुगालिया यांच्यावर प्रणव अदानी यांच्यासोबत काम करणार आहेत. प्रणव अदानी हे अदानी ग्रुपच्या अॅग्रो, ऑईल आणि गॅस कंपन्यांचे तसेच अदानी एन्टरप्रायझेसमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT