अर्थविश्व

एअर इंडिया कर्मचारी संघटनांनी मागितले ५०,००० कोटींचे आर्थिक पॅकेज

वृत्तसंस्था

एअर इंडिया कर्मचारी संघटना आणि स्टाफ संघटनांनी संयुक्तपणे  भारत सरकारकडे ५०,००० कोटी रुपयांची मदत मागितली आहे. देशासाठी एअर इंडिया आवश्यक आहे, असे या संघटनांचे म्हणणे आहे. या संघटनांनी संयुक्तपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवले आहे. एअर इंडियाची देशाला आवश्यकता आहे. विशेषत: संकटकाळात एअर इंडियाचे महत्त्व आहे. एअर इंडियाला दिलेल्या विशेष आर्थिक पॅकेजमुळे फक्त एअर इंडियालाच मदत होणार नाही तर त्याचा लाभ सर्व विमानसेवा क्षेत्राला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलादेखील होईल, असेही पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

याआधी पंतप्रधान मोदींनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. यामध्ये सरकारने विविध क्षेत्रांना याआधी केलेल्या मदतीचा आणि रिझर्व्ह बॅंकेने उचललेल्या पावलांचाही समावेश होता. संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

आघाडीच्या अनेक पतमानांकन संस्थांनी कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदरात चालू आर्थिक वर्षात ५ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

'तुम्ही अर्थव्यवस्थेला आणि उद्योग-धंद्यांना चालना देण्यासाठी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजसाठी आम्ही आपल्याला धन्यवाद देतो. सद्यस्थितीत विमानसेवा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे यावर आपणही सहमत व्हाल. म्हणूनच देशातील विमानसेवा क्षेत्राला चालना देणे अत्यंत आवश्यक आहे आणि या क्षेत्राचे कामकाज लवकरात लवकर सुरळीत करणे गरजेचे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. हे सर्व लक्षात घेता आम्ही आपल्याला विनंती करतो की एअर इंडियाला ५०,००० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे. यामुळे दीर्घकालात एअर इंडिया भारतातील सर्वोत्तम आणि सर्वात सक्षम विमानसेवा कंपनी म्हणून उदयास येईल', असे पंतप्रधानांना एअर इंडियाच्या कर्मचारी संघटनांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

संकटकाळात एअर इंडियाने जोखीम घेऊन चांगली कामगिरी केली आहे. वैद्यकीय उपकरणे आणि औषधांची वाहतूक करण्यासाठी भारत आणि चीनसहीत अनेक देशांमध्ये एअर इंडियाने वाहतूक केली आहे. एअर इंडियाने राष्टहिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे संकट काळात देशासाठी एअर इंडियाचे महत्त्व सिद्ध झालेले आहे, असेही या पत्रात पुढे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT