Oxfam-India
Oxfam-India 
अर्थविश्व

श्रीमंत-गरिबांमधील दरी वाढतेय

पीटीआय

नवी दिल्ली - भारतातील श्रीमंत आणखी श्रीमंत, तर गरीब आणखी गरीब होत असल्याचे चित्र आहे. मागील तीन दशकांतील सरकारच्या एकांगी धोरणांचा हा परिपाक आहे. देशातील अब्जाधीशांची संपत्ती मागील वर्षांत एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) १५ टक्के आहे, असे ‘ऑक्‍सफॅम इंडिया’च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

‘ऑक्‍सफॅम’च्या ‘वाढलेली दरी : भारतातील असमानता अहवाल २०१८’मध्ये म्हटले आहे, की देशातील श्रीमंतांकडे असलेली संपत्ती ही प्रामुख्याने भांडवलशाही अथवा वारशाने आलेली आहे. याचवेळी तळातील नागरिकांच्या संपत्तीचे विभाजन होऊन ती आणखी कमी होत आहे. सरकारने १९९१ मध्ये राबविलेल्या आर्थिक सुधारणांमुळे ही आर्थिक असमानता निर्माण झाली आहे. त्यानंतर सरकारने पुढील काळात राबविलेली धोरणे ही परिस्थिती आणखी बिघडण्यास कारणीभूत ठरली. भारतातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती ‘जीडीपी’च्या १५ टक्के आहे. पाच वर्षांपूर्वी ती १० टक्के होती. मागील वर्षात भारतात १०१ अब्जाधीश होते. 

आर्थिक असमानता असलेल्या देशांमध्ये भारत आघाडीवर आहे. उत्पन्न, खर्च, संपत्ती आणि सरकारचे धोरण या सर्व घटकांमध्ये भारताची स्थिती अतिशय खराब आहे. सरकारचे धोरण हे कामगारांपेक्षा भांडवलशाहीला महत्त्व देते. तसेच अकुशल कामगारांपेक्षा कुशल कामगारांना महत्त्व देण्यात येते. देशातील आर्थिक असमानता १९८० मध्ये स्थिर होती. 

त्यानंतर १९९१ पर्यंत त्यात काही प्रमाणात वाढ होण्यास सुरवात झाली; मात्र १९९१ पासून आर्थिक असमानतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यातील वाढ २०१७ पर्यंत कायम आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

संपत्तीवर सुधारणावादी प्रत्यक्ष करप्रणाली तसेच वारसा कर लागू करून हा निधी गरिबांचे आरोग्य, शिक्षण आणि पोषणावर खर्च करायला हवा. देशात या पद्धतीने समान संधीसाठी आशादायक वातावरण निर्माण करता येईल. 
- निशा अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑक्‍सफॅम इंडिया 

जात, धर्म, विभाग आणि लिंगभेदावर विभागणी झालेल्या भारतासारख्या देशात आर्थिक असमानता वाढत राहणे ही चिंताजनक बाब आहे. असमानता कमी करणे हा भारतीय लोकशाहीचा मुख्य उद्देश आहे. 
- प्रा. हिमांशू, अहवाल लेखक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT