RBI
RBI  Sakal
अर्थविश्व

Bank Account : RBI ने बँक खात्याशी संबंधित बदलले नियम; खातेधारकांना करावे लागणार 'हे' महत्वाचे काम

सकाळ डिजिटल टीम

Bank Account RBI New Rule : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकेशी संबंधित नियम आणि इतर गोष्टी बदलत असते. या वेळी आरबीआयने बँक खात्याशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत.

आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या बँक खातेधारकांनी आधीच त्यांची वैध कागदपत्रे सादर केली आहेत आणि त्यांच्या पत्त्यात कोणताही बदल झालेला नाही, त्यांना आता त्यांचे KYC करावे लागेल. तपशील अपडेट करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही.

नवीन नियमानुसार आरबीआयने काय म्हटले

आरबीआयचे म्हणणे आहे की, केवायसी माहितीमध्ये कोणताही बदल न झाल्यास खातेधारक त्यांच्या ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम किंवा अन्य डिजिटल माध्यमातून स्व-घोषणा पत्र सादर करू शकतात.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला...

आरबीआयने गुरुवारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी म्हणजेच ६ जानेवारी रोजी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात म्हटले आहे की केवायसी माहितीमध्ये कोणताही बदल न झाल्यास केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण करण्यासाठी ग्राहकाचे स्व-घोषणा पत्र पुरेसे आहे.

आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, आरबीआयने बँकांना त्यांच्या ग्राहकांना नोंदणीकृत ईमेल आयडी, क्रमांक, एटीएम इत्यादीद्वारे स्वयं-घोषणा करण्याची परवानगी देण्यास सांगितले आहे, जेणेकरून त्यांना बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही.

खोट्या नावाने किंवा बनावट कागदपत्रांचा वापर करून खाते उघडणे, पैशांचे अवैधरित्या हस्तांतर करणे, दुसऱ्या माणसाच्या नावाने आपण व्यवहार करणे असे प्रकार वारंवार होत असतात. त्यांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने केवायसी करणे अनिवार्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT