अर्थविश्व

सायरस मिस्त्रींकडून विश्‍वासघात

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सायरस मिस्त्री यांनी विश्‍वासघात केला असून, ते समूहातील प्रमुख कंपन्यांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप टाटा सन्सने गुरुवारी केला. 

टाटा सूमहातील कंपन्यांची मालकी असलेल्या टाटा सन्सने आज नऊ पानी निवेदन जाहीर केले आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे (आयएचसीएल) नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सायरस मिस्त्री हे स्वतंत्र संचालकांना हाताशी धरून करीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. ‘आयएचसीएल’कडे ताज सूमहातील हॉटेलांचा ताबा आहे. आयएचसीएलमध्ये टाटा सन्सचा २८.०१ टक्के हिस्सा आहे. मागील आठवड्यात झालेल्या कंपनीच्या बैठकीत स्वतंत्र संचालकांनी अध्यक्ष मिस्त्री आणि त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता. 

टाटा स्टील युरोप, डोकोमो-टाटा यांचा संयुक्त प्रकल्प आणि टाटा मोटर्स या अडचणीतील कंपन्यांच्या परिस्थितीत मिस्त्री कोणतीही उल्लेखनीय सुधारणा करू शकले नाहीत. याउलट या कंपन्यांच्या तोट्यात वाढ होऊन त्यांचा बाजारपेठेतील हिस्सा कमी झाला, असे टाटा सन्सने म्हटले आहे. मिस्त्री यांनी केवळ कर्ज लिहून देण्याच्या पलीकडे काही प्रयत्न केले नाहीत, असेही नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

ICC: आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट किती शक्तीशाली आहे? नेतन्याहूंविरोधात अटक वॉरंट जारी केल्यास काय होणार?

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT