jobs 
अर्थविश्व

Budget 2020 : भारताने चीनचा मंत्र अवलंबवावा; बेरोजगारीचे आव्हान मोठे 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील वाढती बेरोजगारी हे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचे मोठे आव्हान आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठीच्या आर्थिक पाहणी अहवालात भारताने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी चीनचे विकासाचे मॉडेल वापरावे अशी सूचना करण्यात आली आहे. 

सध्याच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील स्थितीमुळे भारतासाठी अभूतपूर्व संधी निर्माण झाली आहे. भारतदेखील चीनप्रमाणे मनुष्यबळावर आधारित, निर्यातवर लक्ष केंद्रित करणारे मॉडेल स्वीकारत तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करू शकतो. "मेक इन इंडिया'अतंर्गत भारताला जगाचे उत्पादन केंद्र बनवून 2025 पर्यंत देशात चार कोटी उत्तम पगाराच्या नोकऱ्या तर 2030 पर्यत आठ कोटी रोजगारांची निर्मिती करता येऊ शकेल, असे मत 2019-20 या आर्थिक वर्षासाठीच्या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. चीनसारखे धोरण अवलंबत भारताने उत्पादनांच्या जोडणीवर लक्ष देत मोठे जाळे तयार केले पाहिजे आणि त्यातून श्रीमंत देशांना होणारी निर्यात वाढवली पाहिजे. चीनची निर्यात मुख्यत: मनुष्यबळावर आधारित असून जगाला लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे करून जगभरात त्याची निर्यात करून चीनने ग्लोबल व्हॅल्यी चेनद्वारे करण्याचे कौशल्य चीनने साध्य केले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. 

2011-12 ते 2017-18 या कालावधीत देशामध्ये ग्रामीण भागात 1.21 कोटी तर शहरी भागात 1.39 कोटी रोजगाराची निर्मिती झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील मनुष्यबळात महिलांचे प्रमाण घटले आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT