China 
अर्थविश्व

भारतीय उत्पादनांवर चीनकडून शुल्क कमी

यूएनआय

बीजिंग - भारत, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया आणि लाओस या देशांमधील उत्पादनांवरील आयात शुल्कात चीनने कपात करण्याची घोषणा केली आहे. 

चीनच्या अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २ हजार ३२३ प्रकारच्या वस्तूंवरील आयात शुल्कात कपात केली जाणार आहे. यामध्ये काही रसायने, ऑप्टिकल कॉम्पोनन्ट आणि दूरचित्रवाणी कॅमेरे यांचा समावेश आहे. आशिया-प्रशांत व्यापार करार २००१ नुसार चीनने हा नर्णय घेतला आहे. चीनचा जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) समावेश होण्याआधी हा करार झाला होता. 

भारत, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया आणि लाओस या पाच देशांमधील सोयाबीनवरील आयात शुल्क हटविण्यात आले आहे. याआधी हे शुल्क तीन टक्के होते. याचबरोबर सोयाबीनच्या खाद्यपदार्थांवरील पाच टक्के आयात शुल्कही माफ केले आहे.

अडीच लाख टन निर्यात  
भारत हा सोयाबीनचा मोठा निर्यातदार आहे. गेल्या वर्षी भारताने २ लाख ६९ हजार २७५ टन सोयाबीनची निर्यात केली होती. आशिया-प्रशांत व्यापार करारातील सहा सदस्य देशांमध्ये चर्चा झाल्यानंतर हा आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजू शेट्टींना कन्नड भाषेतच बोलण्याचा आग्रह, मराठी बोलण्यास विरोध; कर्नाटकात शेतकरी नेत्याला बोलूच दिलं नाही, कन्नड संघटनांचा संताप

Pune Weather : पुणेकरांना मोठा दिलासा! सलग तीन दिवस पावसाची उघडीप कायम; मात्र तापमानाचा पारा ३० अंशावर

‘हेरा फेरी’चा हिरो आता बिझनेसमन! सुनील शेट्टीने जावई आणि ल्योकासोबत उभारला नवीन व्यवसाय, महिलांसाठी खास वस्तू आणली बाजारात

Maharashtra Rains: जुन्या पिढीपेक्षा आताची पिढी जास्त पावसाळे पाहतेय.. लांबलेल्या पावसामुळे सोशल मीडियावर मनोरंजक कॉमेंट्सची बससात

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

SCROLL FOR NEXT