GDP
GDP 
अर्थविश्व

विकासदर ७.२ टक्के

पीटीआय

नवी दिल्ली - कृषी आणि उत्पादन क्षेत्राची कामगिरी बहरल्याने यंदा विकास दर ७.२ टक्के राहील, असा अंदाज सांख्यिकी विभागाने वर्तवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात जीडीपीने ६.७ टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली होती. सांख्यिकी विभागाने आज जीडीपी अंदाज जाहीर केला.

यात गतवर्षाच्या तुलनेत विकास दरात सुधारणा होणार असली, तरी रिझर्व्ह बॅंकेच्या अंदाजानुसार कमीच आहे. यापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने चालू वर्षात विकास दर  ७.४ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. चालू वर्षात कृषी, मत्स्य उद्योगाशी संबंधित क्षेत्रांची ३.८ टक्‍क्‍यांनी वृद्धी होईल. त्याशिवाय कारखाना उत्पादन क्षेत्राची ८.३ टक्‍क्‍यांनी वाढ होणार आहे. गेल्या वर्षी उत्पादन क्षेत्राचा ५.७ टक्‍क्‍यांनी विकास झाला होता. मात्र, खाणकाम, व्यापार, दळणवळण, हॉटेल्स, प्रसारण सेवांची कामगिरी खालावली असल्याचे सांख्यिकी विभागाने म्हटले आहे. 

सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवांची वाढदेखील ८.९ टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित राहिली. ऊर्जा, वायू, पाणीपुरवठा आणि इतर आवश्‍यक सेवांमध्ये वाढ झाली आहे. त्याशिवाय बांधकाम क्षेत्र पूर्वपदावर येत असल्याचे सांख्यिकी विभागाने म्हटले आहे. बांधकाम क्षेत्राची ८.९ टक्‍क्‍यांनी वृद्धी झाली. या क्षेत्राशी संबंधित सेवांमध्ये ६.८ टक्‍क्‍यांनी वृद्धी झाली आहे. गुंतवणुकीचा विचार करता २०१८-१९ या वर्षात ५५.५८ लाख कोटींची गुंतवणूक झाली. 

गेल्या आर्थिक वर्षात ४७.७९ लाख कोटींची गुंतवणूक झाली होती. सरकारच्या खर्चातदेखील वाढ होणार आहे. चालू वर्षात २१.७० लाख सरकारला खर्च करावे लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१७-१८ या वर्षात १९.०८ लाख कोटींचा खर्च झाला होता.

दरडोई उत्पन्न वाढले
सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार दरडोई राष्ट्रीय उत्पन्नात ११.१ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. भारतीयांचे दरडोई उत्पन्न १ लाख २५ हजार ३९७ रुपयांपर्यंत वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT