अर्थविश्व

भारत अग्रगण्य डिजिटल समाज बनणार - मुकेश अंबानी

वृत्तसंस्था

मुंबई : भारत जगातील अग्रगण्य डिजिटल समाज बनण्याच्या मार्गावर असून, देशाची अर्थव्यवस्था जगातील आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनेल, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘फ्युचर डिकोडेड सीईओ समिट’मध्ये मुकेश अंबानी यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्याशी संवाद साधला. या वेळी अंबानी म्हणाले, ‘‘भारतातील या मोठ्या बदलांमध्ये वेगवान मोबाईल नेटवर्कच्या प्रसाराचा महत्त्वाचा वाटा आहे. पंतप्रधानांनी आम्हाला २०१४ मध्ये डिजिटल भारताचे स्वप्न दाखविले, तेव्हाच याची सुरुवात झाली. जिओच्या ४ जी तंत्रज्ञानाकडे ३८ कोटी नागरिक वळले आहेत.

भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. फक्त हे पाच वर्षांत होते की दहा वर्षांत, एवढेच पाहावे लागेल. आपले बालपण ज्या वातावरणात गेले, त्यापेक्षा अगदी वेगळा भारत पुढील पिढीला दिसेल.’’ रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर क्‍लाउड तंत्रज्ञानासंदर्भात मायक्रोसॉफ्टने केलेल्या भागीदारीचा उल्लेख सत्या नडेला यांनी या वेळी केला. मायक्रोसॉफ्टने २०१९ मध्ये रिलायन्सबरोबर १० वर्षांचा करार केला आहे. रिलायन्सच्या डेटा सेंटरना तंत्रज्ञानाचे पाठबळ देण्यासंदर्भातील हा करार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India EU FTA : खुशखबर ! कार्सच्या किमती आणखी कमी होणार; भारताच्या 'या' डील नंतर कार खरेदी करणाऱ्यांची होणार चांदी

प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री! ‘लग्नाचा शॉट’मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Crime: धक्कादायक! समलिंगी संबंध ठेवण्यास विद्यार्थिनीचा नकार; आत्यानं रुद्राक्षाच्या माळांनी गळा दाबून संपवलं

Latest Marathi news Update : शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच रायगडमधील राजकारणावर मोठ वक्तव्य

Bank Closed : सलग चार दिवस बँका बंद! 27 जानेवारीला बँकिंग सेवा का बंद राहणार? बँकेत जाण्याआधी जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT