अर्थविश्व

भारत अग्रगण्य डिजिटल समाज बनणार - मुकेश अंबानी

वृत्तसंस्था

मुंबई : भारत जगातील अग्रगण्य डिजिटल समाज बनण्याच्या मार्गावर असून, देशाची अर्थव्यवस्था जगातील आघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनेल, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘फ्युचर डिकोडेड सीईओ समिट’मध्ये मुकेश अंबानी यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्याशी संवाद साधला. या वेळी अंबानी म्हणाले, ‘‘भारतातील या मोठ्या बदलांमध्ये वेगवान मोबाईल नेटवर्कच्या प्रसाराचा महत्त्वाचा वाटा आहे. पंतप्रधानांनी आम्हाला २०१४ मध्ये डिजिटल भारताचे स्वप्न दाखविले, तेव्हाच याची सुरुवात झाली. जिओच्या ४ जी तंत्रज्ञानाकडे ३८ कोटी नागरिक वळले आहेत.

भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. फक्त हे पाच वर्षांत होते की दहा वर्षांत, एवढेच पाहावे लागेल. आपले बालपण ज्या वातावरणात गेले, त्यापेक्षा अगदी वेगळा भारत पुढील पिढीला दिसेल.’’ रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर क्‍लाउड तंत्रज्ञानासंदर्भात मायक्रोसॉफ्टने केलेल्या भागीदारीचा उल्लेख सत्या नडेला यांनी या वेळी केला. मायक्रोसॉफ्टने २०१९ मध्ये रिलायन्सबरोबर १० वर्षांचा करार केला आहे. रिलायन्सच्या डेटा सेंटरना तंत्रज्ञानाचे पाठबळ देण्यासंदर्भातील हा करार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT