RBI  Sakal
अर्थविश्व

"देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी १२ वर्षे लागतील"

कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोना महामारीने संपूर्ण जगासह भारताची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. रूळावरून घसरलेली ही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी 12 वर्षे लागतील, असा अहवाल केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या संशोधन पथकाने दिला असून, कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे. (RBI Report On Indian Economy)

अहवालानुसार, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे आर्थिक गतीला चालना देण्याचा वेगही मंदावला आहे. युद्धामुळे वस्तूंच्या किमती वाढणे, जागतिक आर्थिक दृष्टीकोन कमकुवत होणे आणि गंभीर जागतिक आर्थिक परिस्थिती यामुळेही अडचणी निर्माण झाल्या असल्याचे म्हटले आहे. RBI च्या 2021-22 या आर्थिक वर्षातील चलन आणि वित्तविषयक अहवालात असेही म्हटले आहे की, चलन आणि वित्तीय धोरणामध्ये नियतकालिक समतोल राखणे हे स्थिर वाढीच्या दिशेने पहिले पाऊल असावे. मात्र, हा अहवाल कुणा एकाचे मत नसून ज्या व्यक्तींनी हा अहवाल तयार केला त्यांचे हे मते असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय बँकेने दिले आहे.

या अहवालात अनेक संरचनात्मक सुधारणा सुचवण्यात आल्या असून, यामध्ये कमी किमतीच्या जमिनीचा दावामुक्तीचा वापर वाढवणे, शिक्षण आणि आरोग्यावर सार्वजनिक खर्च वाढवणे आणि स्किल इंडिया मिशनद्वारे कामगारांची गुणवत्ता सुधारणा अशा प्रकारच्या अनेक सूचनांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Padole Accident : काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात; कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले

करण जोहरने अनन्याला केला चुकीचा स्पर्श? नेटकरी संताप व्यक्त करत म्हणाले...'अभिनेत्रींना अशा स्पर्शांचं काहीच कसं...' Viral Video

Latest Marathi News Live Update : अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदी काठावर नवीन घाट बांधण्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपयांची मंजुरी

Iran Attack Kuwait : कुवेतच्या वीजनिर्मिती आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर इराणचा मोठा हल्ला; भारतीय कामगाराचा मृत्यू

Vidarbha News: पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल; सार्वजनिक सुरक्षेसाठी पेट्रोल पंप नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

SCROLL FOR NEXT