अर्थविश्व

गुंतवणूकदारांची रोख्यांकडे पाठ 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अर्थव्यवस्थेतील मंदी, कंपन्यांना देणी परत करण्यात आलेले अपयश आणि भांडवली बाजारातील अनिश्‍चिततेमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. याचा फटका अपरिवर्तनीय रोख्यांना (नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स "एनसीडी') बसला आहे.

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत कंपन्यांनी "एनसीडी'तून केवळ सात हजार कोटींचा निधी उभारला आहे. तसेच यंदा गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा "एनसीडी'मधून होणाऱ्या निधी उभारणीत तब्बल 67 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. 

भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या माहितीनुसार 2018-19 या वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत कंपन्यांनी एनसीडी इश्‍यू करून 21 हजार 48 कोटींचा निधी उभारला होता; मात्र गेल्या वर्षभरात कॉर्पोरेट्‌सला मंदीने ग्रासले आहे.

अनेक बड्या कंपन्यांना रोकडटंचाईमुळे गुंतवणूकदारांची देणी मुदतपूर्तीनंतर चुकती करण्यात अपयश आले. ज्यामुळे गुंतवणूकदारांचा एनसीडी गुंतवणुकीवरील विश्‍वास उडाला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. चालू वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत बाजारात 14 एनसीडी दाखल झाले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT