अर्थविश्व

मंदी रोखण्यासाठी खासगी गुंतवणुकीला चालना आवश्‍यक

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई: मंदीमुळे विकासात अडथळे निर्माण झाले असले तरी मंदीचा प्रभाव सौम्य आहे. मंदीला रोखण्यासाठी मागणी वाढवणे आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याला धोरणकर्ते आणि सरकारला प्राधान्य द्यावे लागेल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

"आरबीआय'ने गुरूवारी (ता.28) वार्षिक अहवाल जाहीर केला. ज्यात अर्थव्यवस्थेवरील मंदीबाबत उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेची नेमकी समस्या शोधणे कठिण आहे. सध्याची समस्या ही मूळ प्रश्‍नापासून निर्माण झालेली नसून जमीन, कामगार आणि कृषी उत्पादनांशी संबधित आहे, असे "आरबीआय'ने म्हटले आहे. सध्याचा मंदीचा प्रभाव हा सौम्य आहे की आणखी तीव्र होणारा आहे किंवा मूळातून उत्पन्न झालेला आहे, हा मुख्य प्रश्‍न असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. मंदी सौम्य असून त्यामुळे तात्पुरत्या प्रमाणात घसरण होईल, असा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केला आहे. 

बॅंकेने सलग चौथ्या पतधोरणात व्याजदर कमी केला. यामुळे रेपो दर 1.10 टक्‍क्‍याने कमी झाला असून तो 5.4 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे.रेपोचा दर गेल्या नऊ वर्षांतील नीचांकी स्तरावर आहे. मात्र विकासाला चालना देण्यासाठी मागणी वाढवणे आणि खासगी गुंतवणुकीबाबत सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्‍यक आहे, असे "आरबीआय"ने म्हटले आहे. जमीन सुधारणा, कामगार कायद्यात सुधारणा आणि व्यवसाय सुलभतेला सरकारने भर दिल्यास विकासाला पोषक वातावरण निर्माण होईल, असे बॅंकेने म्हटले आहे. कर्जमाफी, आर्थिक पॅकेज, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी यामुळे सरकारला वित्तीय मर्यादा येतील, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र मॉन्सूनची समाधानकारक कामगिरी आणि चलनवाढीवर नियंत्रण याबाबी तूट नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतील, असे बॅंकेने म्हटले आहे. अमेरिका-चीन संघर्षाचे जागतिक बाजारावर परिणाम होणार असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेची भक्कम पाळेमुळे या धोक्‍यापासून संरक्षक ठरणार आहेत. 

यामुळे वाढेल विकासदर ! 
- बॅंका आणि एनबीएफसी कंपन्यांना सक्षम करणे 
- पायभूत सेवा सुविधांवरील खर्च वाढवणे 
- जमीन आणि कामगार कायद्यातील सुधारणा 
- खासगी गुंतवणुकीला चालना देणे 
----- 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT