अर्थविश्व

मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रिलायन्स उतरणार काश्मीरमध्ये

वृत्तसंस्था

मुंबई : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता काश्मीरची दारे सर्वांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे रिलायन्स समुहाने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत आज (सोमवार) 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या बैठकीत मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली. रिलायन्स जिओने गेल्या वर्षात मोठी भरारी घेतली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत रिलायन्सचे मोठे योगदान आहे. लोकाभिमुख उद्योग समूह करण्यात यश आल्याचे रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सांगितले.

अंबानी यांनी काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणेसेह पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च समुह उचलणार असल्याचीही घोषणा केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते.

अंबानी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर व लडाखबद्दल एक स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे आमच्या कंपनीने काश्मीर आणि लडाखमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी आम्ही एक टीम बनविली असून, लवकरच ती तेथे जाऊन सर्वेक्षण करेल. येथील गुंतवणूक आम्ही लवकरात लवकर घोषणा करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT