अर्थविश्व

विकास दर 5.7 टक्‍क्‍यांपर्यंत घसरणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: मागणीतील घट, रोडावलेली गुंतवणूक आणि सेवा क्षेत्राच्या सुमार कामगिरीने विकासाचा वेग मंदावणार आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत विकास दर 5.7 टक्‍क्‍यांपर्यंत घसरेल, असा नवा अंदाज नोमुरा या संस्थेने व्यक्त केला आहे. नोमुराच्या विकासदराच्या अंदाजाने गुंतवणूकदार धास्तावले असून त्याचे पडसाद बुधवारी (ता. 21) भांडवली बाजारावर उमटले. 

चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते जून) भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 5.7 टक्‍क्‍यांपर्यंत खाली येईल, असे नोमुराने अहवालात म्हटले आहे; मात्र जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असे संस्थेने म्हटले आहे. 2018-19 या वर्षात विकासदर 6.8 टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित राहिला. 2014-15 नंतर विकासदराची निराशाजनक कामगिरी ठरली. अर्थव्यवस्थेतील बहुतांश क्षेत्रांमध्ये मंदीसदृश स्थिती आहे. यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांमधील नकारात्मक वातावरण आहे. मागणीमध्ये प्रचंड घट झाली आहे. त्याशिवाय गुंतवणूक आटली आहे. रुपयातील अवमूल्यन, व्यापारी संघर्ष यासारख्या बाह्य घटकांचाही अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे नोमुराने म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: आता पालकमंत्री नसलात तरी…; ८ महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘पॉवर शिफ्ट’ निर्णय, पण मित्रपक्षांना धक्का

भारतीय संगीतकारांनी केलेली मोठी चूक ! भरपाई म्हणून ऑफर केलं पाकिस्तानी गायिकेला गाणं; आजही आहे सुपरहिट

Theur Crime : अकरावीच्या विद्यार्थिनीवर वर्गातीलच अल्पवयीन मित्राकडून वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यावर प्रकार आला उघडकीस

Latest Marathi News Updates : वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला स्थगिती देण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय १५ सप्टेंबर रोजी अंतरिम आदेश देणार

India vs Pakistan Asia Cup : 'आशिया कप'मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणे भारताची मजबूरी का आहे? माजी क्रीडामंत्र्यांनीच सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT