अर्थविश्व

दिलासा: आजपासून 'या' गोष्टी देशभरात स्वस्त

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: सर्वसामान्य लोकांना आजपासून थोडा दिलासा मिळणार आहे. मोदी सरकारने घेतलेल्या काही निर्णयांची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. बँकिंग आणि ऑटो क्षेत्राकडून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) आरटीजीएस व एनईएफटी पाठोपाठ आता एमिजिएट पेमेंट सर्व्हिसच्या (आयएमपीएस -  IMPS) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवरील शुल्कही हटविण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी देखील आजपासून होणार आहे. तसेच एसबीआयच्या नेट बँकिंग आणि मोबाईल अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांनादेखील आता कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

मोदी सरकारने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आता आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) समितीने इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटीचा दर आता 12 टक्क्यांवरून कमी करून थेट 5 टक्क्यांवर आणला आहे. याचबरोबर ईव्ही चार्जर्सवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून कमी करून 5 टक्के केला आहे. नवीन दर 1 ऑगस्ट 2019 पासून  म्हणजेच आजपासून लागू करण्यात आले आहेत. 

इलेक्ट्रिक कारवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. साधारणतः 20 लाखांपर्यंतच्या गाड्यांची किंमत एक लाख रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

IAS Officer Tukaram Mundhe : "मी आयएएसमधून निवृत्त होईन, पण सार्वजनिक सेवेतून कधीही निवृत्त होणार नाही,"; तुकाराम मुंढेंच्या विधानाने नव्या चर्चांना उधाण

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

SCROLL FOR NEXT