Supreme Court Rules Against Telecom Operators In Rs 92,000 Cr Adjusted Revenue Dispute  
अर्थविश्व

एअरटेल, व्होडाफोन-आयडियाला 92,000 कोटींचा दणका...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे एअरटेल, व्होडाफोन आयडिया या आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांना तब्बल 92,000 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू संदर्भात केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अरुण मिश्रा, एस अब्दुल नझीर आणि एम आर शाह यांच्या बेंचने केंद्र सरकारची बाजू मान्य केली आहे. यामुळे केंद्र सरकार आणि दूरसंचार कंपन्यांमधील 14 वर्ष जुना कायदेशीर लढा संपला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांना लायसन्स शुल्क आणि स्पेक्ट्रम युजेस चार्जेससाठी 92,641 कोटी रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. दोन्ही कंपन्यांना याचा चांगलाच आर्थिक फटका यामुळे बसणार आहे. दूरसंचार विभागाच्या युक्तिवादानुसार या शुल्कामध्ये व्याजातून मिळालेले उत्पन्न, लाभांश, मालमत्ता विकून मिळालेला नफा, विम्याचे क्लेम आणि परकी चलनातील उत्पन्न यांचा अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूमध्ये समावेश करण्यात आला आहे.  

शेअर बाजारात व्होडाफोन-आयडियाचा शेअर आज 23.36 टक्क्यांच्या घसरणीसह 4.33 रुपयांवर व्यवहार करत बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 12,442.42 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रासाठी काटेकोर पडताळणी अनिवार्य - बावनकुळे

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT