Shashi Tharoor 
अर्थविश्व

...तेव्हा रुपया ५० रुपयांच्या आसपास होता; थरुरांचा PM मोदींवर हल्लाबोल

सध्या तुम्हाला प्रत्येक आयात गोष्टीला जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमुल्यन होऊत तो ८० वर गेल्यानं काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा रुपया ५० रुपयांवर होता आता तो ८० रुपयांवर पोहोचला आहे, अशा शब्दांत त्यांनी सडकून टीका केली. (then rupee value was around 50 rupees Shashi Tharoor attack PM Modi)

थरुर म्हणाले, मोदी सत्तेत आले तेव्हा रुपया ५० रुपयांवर होता आता तो ८० रुपयांवर पोहोचला आहे. आता जबाबदारीचा प्रश्न कुठे आहे? तुम्हाला आता प्रत्येक आयातीच्या वस्तूसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत कारण रुपयाची किंमत घसरली आहे. तसेच इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत, महागाई वाढत आहे त्याचबरोबर आता जीएसटीचं अतिरिक्त ओझं सर्वसामान्य माणसावर पडलं आहे.

रुपया 80 च्या पुढे गेला आहे. मोदीजींनी हा मुद्दा सन 2014 च्या निवडणुकीचा मुद्दा बनवला. ते सत्तेत आले तेव्हा रुपया मजबूत करणार होते कारण आधीचं सरकार कमकुवत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मग आत्ताची परिस्थिती काय आहे? ते आपल्याला मजबूत सरकार देत आहेत का? असा सवालही थरुर यांनी विचारला आहे.

दरम्यान, भारतीय चलन असलेल्या रुपयाचं आज डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झालं. आज (१९ जुलै २०२२) रुपया डॉलरच्या तुलनेत ८०.०५ रुपयांवर पोहोचला. गेल्याकाही दिवसांपासून रुपयाच्या मुल्यात सातत्यानं पडझड सुरु आहे. रुपयाचं मुल्य घसरल्यानं आपल्याला आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टी जास्त पैसे देऊन खरेदी कराव्या लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT