नरेंद्र मोदी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सध्या चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याने तात्पुरता चलनतुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दैनंदिन कामाच्या व्यवहारासाठी रोख पैशाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत; पण यावर उपाय आहे तो रोखविरहित व्यवहारांचा. हळूहळू आपली वाटचाल त्या दिशेनेच होत असल्याने रोखविरहित व्यवहारांचे स्वरूप प्रत्येकाने समजावून घ्यायला हवे. अशा व्यवहारांमुळे बेहिशेबी पैशाचे प्रमाण कमी होते आणि नागरिकांनाही ते फायदेशीर ठरते.
अनेक कंपन्यांचे ई-वॉलेटचे पर्याय उपलब्ध आहेत. "मोबाईल वॉलेट' ही संकल्पना आता आपल्याकडे रुळायला काही कालावधी लागेल. मात्र
केंद्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर ई-वॉलेटची सोय देणाऱ्या अनेक कंपन्या चर्चेत आल्या. त्यामुळे "कॅशलेस' होण्यासाठी अशा "ई-वॉलेट'ची माहिती असणे आवश्यक आहे. अर्थशास्त्रात पैशाचे सात महत्त्वाचे गुणधर्म सांगितले आहेत. त्यामध्ये टिकाऊपणा, एकसारखेपणा, मर्यादित पुरवठा, सर्ववाहकता, विभक्तीकरण आणि सर्वमान्यता. त्यामुळे आता व्यापक विचार केल्यास "ई-मनी'पर्यंत त्यांचा विस्तार झाला आहे. ई-मनी'मध्ये देखील पैशाच्या सात महत्त्वाच्या गुणधर्मांचा समावेश आहे.
कॅशलेस होण्याचे पर्याय
किफायतशीर खरेदीबरोबरच अप्रत्यक्षरीत्या पैसे वाचवण्याचा मार्गही या ई-वॉलेटमुळे खुला झाला आहे.
तरुणांना आवाहन आणि आव्हानही
आजची आधुनिक पिढी ही अधिक तंत्रज्ञानस्नेही झाली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना विशेषत: ज्येष्ठांना रोखविरहित व्यवहारांची माहिती करून द्यावी. रोखीशिवाय व्यवहारांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा निर्माण होतो. मात्र बिनारोखीच्या व्यवहारांमुळे फसवाफसवी कमी प्रमाणात होणार आहे. बिनरोखीच्या व्यवहारांची सुरवात ई-कॉमर्स कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात झाली. सुरवातीला ग्राहकाला फसवण्यासारख्या काही घटना घडल्या. परंतु ई-कॉमर्स पारदर्शक झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाचा विश्वास बिनरोखीच्या व्यवहारांवर वाढला आहे.
ई-वॉलेटच्या माध्यमातून व्यवहार करताना कोणताही वापर शुल्क (कन्व्हिनिअन्स फी) घेतले जात नाही. त्यामुळे बऱ्याचदा लोकांच्या मनात शंका येते की, ई-वॉलेटचा वापर केल्याबद्दल मूळ बिलापेक्षा अधिक रक्कम द्यावी लागेल. मात्र बऱ्याचदा ई-वॉलेटद्वारे व्यवहार केल्यास "कॅशबॅक' मिळतो.
बऱ्याचदा ज्यांच्याकडे पैसे नसले की त्यांना गरीब म्हटले जाते. मात्र "कॅशलेस' असणे म्हणजे गरीब नव्हे. कारण आपण फक्त रोख स्वरूपात रक्कम जवळ बाळगत नसलो तरी आपल्या खात्यात ती रक्कम पडून असते. मग आपण विविध ई-वॉलेट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून आपल्याला हवी ती वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.