Blog | ब्लॉग

कारणराजकारण : कोथरूडला बालेकिल्ला म्हणून गृहीत धरणे भाजपला पडू शकते महागात

सचिन बडे

पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा आहे. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांना या भागातून सुमारे एक लाखाचे मताधिक्य मिळाले होते. मात्र, या लोकसभा निवडणुकीत भाजपने या बालेकिल्ल्याला गृहीत धरणे भाजपला चांगलेच महागात पडू शकते. कोथरूडच्या बऱ्याच भागात विशेषतः वस्ती भागात भाजपविषयी नाराजी दिसून येते. 

'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या मालिकेमार्फत लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांशी झालेल्या चर्चेतून विद्यमान सरकारविषयीचा रोष स्पष्ट जाणवत होता. नगरसेवक, आमदार आणि खासदार हे भाजपचेच असून महापालिका, राज्य आणि केंद्र पातळीवर भाजपचेच सरकार आहे. तरी, अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. केलेले वायदे पूर्ण झालेले नाहीत, अशा तक्रारी हे नागरिक करतात. त्यामुळे या भागाची भाजपला कितपत साथ मिळते हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. 

भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी सुरवातीला ही निवडणूक अतिशय हलक्‍यात घेतली. मात्र, काँग्रेसने निष्ठावान कार्यकर्ते आणि शहरात ओळख असलेले माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीवरून बापट यांचा विजय आणखीच सोपा होईल असे सांगितले जात होते. मात्र, जमिनीवर परिस्थिती फार वेगळी आहे. नागरिक विद्यमान सरकारवर नाराज आहेत. योजनांचे फक्त गाजर दाखविले जाते प्रत्यक्षात कोणतीच कामे केली जात नसल्याचे नागरिक सांगतात. 

शास्त्रीनगरमधील महिलांना उज्वला योजनेतून गॅस मिळाले नसल्याचे त्यांच्याशी चर्चा करताना काही महिलांनी सांगितले. केळेवाडीतील नागरिकांचा घरांचा प्रश्‍न अडकून पडला आहे. मागील तीन वर्षापासून रेशन मिळत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. कोथरूड परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांना सायंकाळी, रात्री घराबाहेर पडण्यास भीती वाटते, असे येथील स्थानिक सांगतात. कोथरूड मध्ये वाहतूक कोंडी, अपुरे पाणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी अपुऱ्या सोयीसुविधा, वस्ती भागामध्ये नसलेल्या पायाभूत सुविधा, परिसरातील अस्वच्छता, अशा समस्या आ वासून उभ्या आहेत. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. तसेच याचा परिणाम भाजपला या लोकसभा निवडणुकीत भोगावा लागेल, असा इशाराही हे नागरिक देत आहेत. सोसायटी भागासह पायाभूत सुविधा पूर्ण झालेल्या भागात मात्र, भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. 

भाजपला मागील निवडणुकीत मिळाले तेवढे यश यावेळी मिळेल याबाबत शंका आहे. याला भाजपचे स्थानिक पातळीवरच्या सरकारपासून ते केंद्रातील मोदी सरकार जबाबदार राहणार आहे, असे येथील लोकांच्या बोलण्यात जाणवते. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोथरूडला गृहीत धरणे भाजपला महागात पडू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT