Citizen Journalism

परिहार चौकात वाहतुक समस्या

चेतन देवरे

औंध : परिहार चौक ते ब्रेमेन चौक दरम्यान रस्त्याचे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुशोभीकरण करण्यात आले. यात रस्त्याचे काँक्रिटिकरण, सुसज्ज पदपथ, सायकल ट्रॅक करण्यात आले. मात्र हे सर्व केल्यानंतर मुख्य वाहतुकीसाठी वाहनांना फक्त एकच लेन उरली आहे. परिणामी अतिशय वर्दळीच्या ह्या परिसरात नागरिकांना प्रचंड वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात आधीपासुन वाहतुक प्रश्न ऐरणीवर असताना ह्या प्रकल्पामुळे त्यात अधिक भर पडली. यात नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. महापालिकेचा हा प्रकल्प बीआरटी प्रमाणेच पूर्णतः अयशस्वी ठरलेला दिसतो आहे.

स्मार्ट सिटीच्या ह्या प्रकल्पामुळे जंगली महाराज रोड येथेही अशाच प्रकारची वाहतुक समस्या निर्माण झाली प्रशासनाला विनंती आहे कि त्यांनी असा प्रकल्प राबवताना योग्य नियोजन करून मुख्य रस्त्याची रुंदी कमी न करता ती आणखी वाढवावी व त्यानंतर त्याबाजुला सायकल ट्रॅक, सुसज्ज पदपथ उभारावेत. ठिकठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारावेत. तेव्हा पुणे शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट शहर होईल. ब्रेमेन चौक ते पुणे विद्यापीठ हा रस्ता त्याचे उत्तम उदाहरण आहे. (बीआरटी विरहित) माध्यमे व सामाजिक संस्थांनी याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

SCROLL FOR NEXT