Astro Tips
Astro Tips google
संस्कृती

Astro Tips: थांबा!! कणिक मळताना या चुका अजिबात करू नका

नमिता धुरी

मुंबई : आपल्या घरात कणिक रोजच मळली जाते; त्यात नवीन ते काय? विचार साधारण बरोबरच आहे, पण रोज जरी कणिक मळली जात असली तरी ती योग्य पद्धतीने मळली जाणंही तेवढंच महत्वाचं आहे.

ज्योतिष शास्त्रात जसे घराविषयी तसेच घरातले काम कसे करावे याविषयी सुद्धा नियम सांगितलेले आहेत. ज्यांचे पालन घरात सकारात्मकता वाढते आणि जर यांचं पालन केलं नाही तर घरात नकारात्मक उर्जा येते आणि घराची वाढ खुंटते. तुमचा ज्योतिषावर विश्वास नसला तरी ही सवय आरोग्याच्या दृष्टीनेही वाईट मानली जाते.

कणिक जेवढी गरजेची आहे तेवढीच मळावी. उगाच जास्तीची भिजून बाजूला ठेवली तर घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते.

घराच्या आशीर्वादासाठी फेंगशुई टिप्सनुसार, कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवणे किंवा उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवणे अशुभ मानले जाते. असे केल्याने, घराला अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळत नाही.

कणिक मळून गोळा केला की त्यावर चार बोट उमटवावे; अस म्हणतात, जेव्हा मुलगी किंवा सून यांच्या बोटांचे ठसे गोळ्यावर पडतात तेव्हा घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

पीठ कधीही उघडे ठेवू नये. याचे एक कारण आरोग्याशी संबंधित आहे की झाकलेले पीठ खराब होत नाही आणि त्यात माशीची डास पडण्याची भीती नसते आणि दुसरे म्हणजे झाकलेले पीठ कुटुंबातील सदस्यांच्या सन्मानाचे रक्षण करते.

पीठ लावल्यानंतर उरलेले पाणी कधीही फेकून देऊ नाही. ते पाणी झाडाला टाकणे शुभ मानले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT