Astro Tips
Astro Tips Esakal
संस्कृती

Astro Tips: राहू दोष तुमचे जीवन कठीण करत आहे का? हे विशेष रत्न धारण करा

सकाळ डिजिटल टीम

कुंडलीत जर राहू दोष असेल तर अशा वेळेस अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यांपासून मुक्त होण्याचा तसा कोणताही मार्ग नाहीये, पण हा राहुदोष सुटण्यासाठी तुम्ही ह्या रत्नाची अंगठी घालू शकतात. राहू आणि केतू हे ज्योतिष शास्त्रात सर्वात क्रोधित ग्रह मानले जातात. असे म्हटले जाते की, राहु-केतू जर कोणावर रागावले तर त्याचा नाश व्हायला वेळ लागत नाही.  यामुळेच लोक आपल्या कुंडलीतून राहू आणि केतूचे दोष दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. 

गोमेद रत्न राहू दोषापासून रक्षण करते.

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीतील विविध दोष दूर करण्यासाठी प्रत्येक ग्रहासाठी एक विशेष रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो.  राहू ग्रहासाठी असेच एक खास रत्न म्हणजे गोमेद रत्न. असे म्हटले जाते की जेव्हा कुंडलीत राहूची स्थिती कमकुवत होते, तेव्हा व्यक्तीवर त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात. त्यामुळे त्याची सर्व कामे खोळंबतात आणि सुरू असलेले काम बिघडते. अशा स्थितीत दोष दूर करण्यासाठी व्यक्तीने गोमेद रत्न धारण करावे. हे रत्न धारण केल्याने कुंडलीत राहूची वक्री कमी होते.

गोमेद रत्न कधी धारण करावे?

ज्योतिषांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध, शुक्र आणि राहू या ग्रहांचा संयोग असेल तर त्याने यातून सुटका मिळण्यासाठी गोमेद रत्न धारण करावे.  हे धारण केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि वाईट परिणाम दूर होतात.

'या' राशीसाठी खूप फायदेशीर

धार्मिक शास्त्रांमध्ये राहू ग्रहाला मकर राशीचा स्वामी मानण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ज्या लोकांची राशी मकर आहे, त्यांनी आपल्या कुंडलीत राहूची स्थिती मजबूत करण्यासाठी आणि त्याचे वाईट प्रभाव कमी करण्यासाठी गोमेद रत्न धारण करावे. 

'या' व्यवसायातल्या व्यक्ती हे रत्ने घालू शकतात

वकिली किंवा न्यायिक कामात गुंतलेल्यांसाठी गोमेद रत्न धारण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने त्यांच्या कारकिर्दीची गाडी वेगाने धाव घेते. त्याचबरोबर राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांनीही गोमेद घालणे फायदेशीर मानले जाते. याशिवाय मिथुन, तूळ, कुंभ किंवा वृषभ राशीच्या लोकांसाठी गोमेद रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT