Astrology
Astrology  Esakal
संस्कृती

Astro Tips: पायात सोन्याचे दागिने घातल्या मुळे लक्ष्मी देवीचा कोप होतो. गरीबी येऊ शकते

सकाळ डिजिटल टीम

एकंदरीतच हिंदू धर्मात, परंपरेमध्ये, ज्योतिष शास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सोन्याला खूप महत्त्व आहे. खरतर हेही म्हणायला हरकत नाही की एखादी बाई नटली पण त्यात तिने सोन्याचा दागिना नाही घातला तर तिलाच ते अनेकदा खटकत.  

डोक्यापासून पायापर्यंत लहान मुलांपासून मोठ्या स्त्री पुरुषांपर्यंत सर्वांसाठीच दागिने आपण बघतो. यापैकी काही दागिन्यांमध्ये वैज्ञानिक, धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारणेही आपल्याला जुन्या ग्रंथामध्ये सापडतात. पण पायात मात्र सोनं न घालता चांदीच्या वस्तू लोकं घालतात; 

पायात सोने घातल्याचे धार्मिक तोटे:

1) सोन्याला एवढं महत्त्व असण्याच कारण म्हणजे भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मी.

2) मुळातच देवी लक्ष्मीला सोने खूप आवडते.

3) धार्मिकदृष्ट्या बघितले तर, लक्ष्मी देवीला आवडणाऱ्या सोन्याला आपल्या पोटाच्या बेंबीपासून खाली कुठेही घातले तर तो तिचा अपमान असतो.

4) ह्याने फक्त लक्ष्मी देविचाच नाही तर भगवान विष्णूंचा कोप होतो. यांची नाराजी आयुष्यात येऊ शकते आणि हे तुम्हाला कंगाल बनवू शकते.  त्यामुळे पायात सोने कधीही घालू नये. 

पायात सोने घातल्याचे वैज्ञानिक तोटे:

1) हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पायात सोने धारण केल्याने आरोग्याला हानी पोहोचते. 

2) वास्तविक, मानवी शरीराच्या वरच्या भागाला उबदारपणा आणि खालच्या भागाला थंडपणाची आवश्यकता असते. 

3) सोने शरीरात उष्णता वाढवते, तर चांदी थंडपणा आणते, त्यामुळे पायात सोन्याऐवजी चांदी घातली पाहिजे जेणेकरून शरीरात तापमानाचे योग्य संतुलन राखले जाईल. 

4) अन्यथा, शरीराच्या तापमानातील असंतुलन अनेक प्रकारे नुकसान करू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT