astro tips  esakal
संस्कृती

Astro Tips : महिलांनी आंघोळ न करता करू नये हे काम; होतील हे वाईट परिणाम

नियम न पाळल्यास घरात येते दारिद्रय

सकाळ वृत्तसेवा

महिलांसाठी स्नान करण्याचे नियम

हिंदू धर्मात दररोज सकाळी स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. आंघोळ न करता पूजा करणे, स्वयंपाकघरात जाण्यास देखील मनाई आहे. महिलांना घरची लक्ष्मी म्हणतात. तिला देवीचे रूप मानले गेले आहे, म्हणून हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत. जर घरातील स्त्रीने या नियमांचे पालन केले तर घरात नेहमी सुख-शांती राहते. आज आपण अशाच काही नियमांबद्दल जाणून घेणार आहोत जे महिलांना आंघोळ केल्याशिवाय करणे निषिद्ध आहे. ते न पाळल्यास घरात दारिद्रय येते.

तुळशीला पाणी

महिलांनी आंघोळ केल्याशिवाय कधीही तुळशीला पाणी घालू नये. तुळशीला पूजनीय मानले जाते, त्याला अशुद्ध हातांनी स्पर्श केल्याने किंवा स्नान न करता पाणी घातल्याने लक्ष्मीचा कोप होतो.

स्वयंपाकघरात प्रवेश

महिलांनी आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नये. अन्नातून ऊर्जा मिळते. अशुद्धतेने बनवलेले अन्न नकारात्मकता देते. त्यामुळे महिलांनी आंघोळीनंतर नेहमी अन्न तयार करावे. तसेच आंघोळ न करता अन्न शिजविणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो. तिला लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दरिद्रयता येते.

जेवण करु नये

आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये. हाच नियम महिलांसाठीही आहे. आंघोळ न केल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो आणि माणूस आळशी बनतो. आंघोळीने उत्साह येतो आणि मनात चांगले विचार येतात.

केस विंचरणे

काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर केस विंचरण्याची सवय असते, ही सवय महिलांना अजिबात नसावी. शास्त्रानुसार महिलांनी सकाळी लवकर आंघोळ केल्यावरच केसांना कंघी करावी.

पैशाला हात लावू नये

धन हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. आंघोळ न करता पैशाला हात लावल्याने लक्ष्मीचा अपमान होतो आणि तिला राग येतो. यामुळे माणूस गरीब होतो. महिलांनी आंघोळीशिवाय कधीही पैशाला हात लावू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! डाव्या छातीत गोळी लागली अन्..

Rohit Arya Children kidnapped : लहान मुलांना डांबून ठेवलं अन् सगळीकडे रॉकेल ओतलं! कोण आहे रोहित आर्य अन् काय होत्या मागण्या?

बनवाबनवीच्या यशाचं भूत गेलेलं डोक्यात, पण एका बादलीने सचिन पिळगावकरांना जमिनीवर आणलं, व्हिडिओ व्हायरल

Powai Children Kidnap: तब्बल ६ दिवस तो चिमुकल्यांना...; रोहित आर्यने किडनॅप करण्यापूर्वी १७ मुलांना स्वत:कडे कसे बोलावले?

Powai Children Kidnap: खळबळजनक! पवईत एका व्यक्तीनं २० मुलांना खोलीत ठेवलं डांबून अन्... असा झाला किडनॅपिंगचा थरार

SCROLL FOR NEXT