Astrology esakal
संस्कृती

Astrology : तुमच्या हातावर आहे का 'अशा' रेषा? लग्नानंतर पडेल पैशांचा पाऊस

या रेषा असणाऱ्या लोकांना नोकरी-व्यवसायात धनलाभ होतो. त्यांचे दांपत्य जीवन पण फार सुखमय होते.

सकाळ डिजिटल टीम

सूनेला घराची लक्ष्मी म्हटले जाते आणि ज्या घरात सूनेचा आदर केला जातो त्या घरात कायम सुख-सामाधान नांदते. बऱ्याच लोकांचे लग्नानंतर भाग्य बदलते हे आपण अनेकवेळा बघतो. हस्तरेषा ज्योतिषानुसार बऱ्याचदा असे दिसून येते की, जोडीदारामुळे आयुष्यात सुखद बदल घडतात. जाणून घ्या कोणत्या रेषेने तुमच्या लग्नानंतर काय बदल घडतील.

चंद्र उंचवटा रेषा

हस्तशास्त्रात सांगितले आहे की, चंद्र पर्वतापासून निघणारी रेषा लग्नाबाबत फार लाभदायी मानली जाते. भाग्य रेषा चंद्र पर्वतापासून ते शनि उंचवटापर्यंत गेली तर हितकारी मानली जाते. लग्नानंतर अशा लोकांचे भाग्य लवकर बदलते. नोकरी-व्यवसायात धनलाभ होतो. अशा लोकांचे दांपत्य जीवन सुखमय होते.

बुध उंचवट्याखालची रेषा

हस्तरेषा शास्त्रानुसार करंगळी खाली बुध उंचवटा असतो. या बुध पर्वतावरच्या रेषांवरूनही लग्नानंतरच्या आर्थिकस्थितीचा अंदाज लावता येतो. बुध उंचवट्यावरच्या रेषा जेवढ्या स्पष्ट तेवढे सुख अधिक मिळते. करिअरमध्ये प्रगती आणि संतती सुख पण मिळते. जर कोणाच्या हातावर भाग्य रेषा मणिबंधपासून निघून शनी उंचवट्यापर्यंत जात असेल तर फार लाभदायक असते. लग्नानंतर अशा लोकांना धनलाभ होतो. हातावर भाग्य रेषा जेवढी स्पष्ट आणि कट न झालेली असेल तेवढे अधिक सुख मिळते.

यशामागे जोडीदाराचा हात

जर कोणाच्या हातावर कोणची रेष अंगठ्यापासून गुरू उंचवट्यापर्यंत जात असेल तर अशा लोकांचे लग्नानंतर भाग्य बदलते. त्यांना कायम जोडीदारची साथ मिळते. लग्नानंतर त्यांच्या करिअरमध्ये वेगाने प्रगती होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT