Paryushana Parv 2022
Paryushana Parv 2022 esakal
संस्कृती

Paryushana Parv 2022 : पर्युषण पर्व म्हणजे काय? जैन समाजातील सर्वात मोठे पर्व

सकाळ डिजिटल टीम

जैन समाजाचा सर्वात पवित्र उत्सव म्हणजेच पर्युषण पर्व आहे. या पर्वात जैन धर्माच्या पाच सिद्धांताचे पालन केले जाते. हे पाच सिद्धांत म्हणजे सत्य, अहिंसा, सतेय ,ब्रह्मचर्य, आणि अपरिग्रह हे होय. यंदा याची सुरुवात 24 ऑगस्ट पासून होणार आहे. जैन धर्मातील श्वेतांबर पंथातील बांधव हे 8 दिवस पर्युषण पर्व साजरा करतात. तर दिगंबर पंथातील बांधव हे 1 सप्टेंबर पासून पूढील दहा दिवस पर्युषण पर्व साजरा करतात. या पर्वात जैन बांधव संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात. हिंदू धर्मातील नवरात्र प्रमाणे जैन समाजात पर्युषण पर्व साजरा केला जातो.

पर्युषण पर्वात जैन समाजातील श्वेतांबर आणि दिगंबर बांधव पवित्र व्रताचे पालन करतात. पर्युषण पर्वाला जैन समाजात सर्वात मोठे पर्व मानला जाते आणि त्यामुळे त्याला पार्वधिराज असेही म्हटले जाते. या पर्वात जैन धर्माच्या पाच सिद्धांताचे पालन केले जाते. हे पाच सिद्धांत म्हणजे सत्य, अहिंसा, असतेय ,ब्रह्मचर्य, आणि अपरिग्रह आहेत. जैन धर्माचे मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दाखवतो. या पर्युषण पर्वात जैन धर्मीय नागरिक संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात. आणि आपल्याकडून झालेल्या चुकां बाबत माफी मागतात.

या उत्सवात जैन बांधव संपूर्ण भक्ती भावाने धार्मिक उपवास करतात. पावसाळ्यात हा पर्व साजरा केला जातो, पावसाळ्यातील चार महिन्यात पृथ्वीतलावर सर्वत्र हिरवळ वाढते. या काळात बऱ्याच प्रकारचे प्राणी सूक्ष्मजीव जन्माला येत असतात. हे सर्व लक्षात घेऊन जैन साध्वीनी या काळात एका ठिकाणी राहून देवाची उपासना करण्याचा संदेश दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT