Rakshabandhan  sakal
संस्कृती

Rakshabandhan 2023: लक्ष्मी मातेने केली होती रक्षाबंधनाची सुरुवात; भगवान विष्णूंना परत आणण्यासाठी...; जाणून घ्या कथा

हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला या रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या पौराणिक कथेबद्दल सांगणार आहोत.

वैष्णवी कारंजकर

रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. हा सण आज म्हणजे ३० ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन तिला देतो. हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला या रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या पौराणिक कथेबद्दल सांगणार आहोत.

अमर उजालाने दिलेल्या माहितीमध्ये म्हटल्याप्रमाणे, धार्मिक कथांनुसार, एकदा राजा बळी अश्वमेध यज्ञ करत असतो. त्यावेळी भगवान विष्णू वामन अवतारात येतात आणि बळीराजाकडे तीन पावलं जमीन दान म्हणून मागतात. राजा तीन पावलं जमीन द्यायला तयारही होतो. राजाने होकार देताच भगवान विष्णू आपला आकार वाढवतात आणि तीन पावलांमध्ये भूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक असं संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकतात. त्यानंतर भगवान विष्णू बळीराजाला राहण्यासाठी पाताळलोक देतात.

बळीराजाने पाताळलोकात राहणं मान्य केलं, पण तो भगवान विष्णूंकडून एक वचन मागतो. भगवान विष्णूही राजाला म्हणतात की जे वचन मागायचं ते माग. तेव्हा बळीराजा म्हणतो की, मी जेव्हाही पाहीन तेव्हा तुम्हालाच पाहीन, झोपल्यावर, जागेपणी मी फक्त तुम्हालाच पाहू इच्छितो. भगवान विष्णू तथास्तू म्हणाले आणि बळीराजासोबत पाताळातच राहू लागले.

जेव्हा भगवान विष्णू बळीराजासोबत राहू लागले, तेव्हा माता लक्ष्मीला त्यांची काळजी वाटू लागली. लक्ष्मीने त्यावेळी नारदांना तिथे फिरताना पाहिलं. तेव्हा लक्ष्मीने नारदांना विचारलं की तुम्ही भगवान विष्णूंना कुठे पाहिलं आहे का? तेव्हा नारदांनी लक्ष्मीला घडलेला सगळा प्रकार सांगितलं. सगळं ऐकून घेतल्यावर लक्ष्मीमातेने भगवान विष्णूंना राजाकडून परत आणण्यासाठीचा उपाय विचारला. नारदांनी लक्ष्मीमातेला सांगितलं की तुम्ही बळीराजाला तुमचा भाऊ करून घ्या आणि त्याच्याकडून भगवान विष्णूंना मागा. त्यानंतर लक्ष्मीमाता वेश बदलून पाताळात पोहोचली.

पाताळात पोहोचल्यानंतर लक्ष्मीमाता रडू लागली. बळीराजाने लक्ष्मीला रडताना पाहिलं आणि रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा लक्ष्मीमातेने सांगितलं की, तिचा कोणीही भाऊ नाही, म्हणून ती रडत आहे. लक्ष्मीमातेचं हे बोलणं ऐकून बळीराजा म्हणाला की तू माझी बहीण हो. त्यानंतर लक्ष्मीमातेने बळीराजाकडून भगवान विष्णूंना मागून घेतलं. धार्मिक संदर्भांनुसार, त्याच काळापासून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT