Spiritual Science esakal
संस्कृती

Spiritual Science : आरतीच्या वेळी टाळ्या वाजवण्याचं धार्मिकच नाही तर, हे आहे शास्त्रीय कारण

भजन, किर्तन किंवा आरती करताना टाळ्या वाजवतात हे आपल्याला माहितीये. यामागचं कारण जाणून घेऊया.

धनश्री भावसार-बगाडे

Clapping Benefits In Arati : तुम्ही हे कायम बघितलं असेल की कुठेही आरती, भजन, किर्तन सुरू असेल तेव्हा लोक टाळ्या वाजवतात. टाळ्या फक्त ताल धरण्यासाठी म्हणून वाजवल्या जात नाहीत. तर यामागे विशेष कारण आहे. ही परंपरा कधी सुरू झाली, शिवाय यामागे काही धार्मिक, वैज्ञानिक कारणं, फायदे आहेत का? विषयी सविस्तर जाणून घेऊया.

भक्त प्रल्हादाने केली होती सुरवात

एका पौराणिक कथेनुसार टाळी वाजवण्याची सुरुवात भक्त प्रल्हादाने केली होती. भक्त प्रल्हादाच्या वडिलांना विष्णू भक्ती आवडत नव्हती. यासाठी त्यांनी अनेक उपाय पण केले. पण प्रल्हादावर त्याचा काहीही परीणाम झाला नाही. एकदा त्यांनी प्रल्हादचे सगळे वाद्य नष्ट केले. हिरण्यकष्यपूला वाटले असं केल्याने प्रल्हाद थांबेल.

पण असं झालं नाही. प्रल्हादाने भगवंताचे स्मरण करताना टाळ्यांचा ताल धरला. या टाळीतून ताल निर्माण झाल्याने याला टाळी असं नाव पडलं. त्यानंतरच टाळ्या वाजवण्याची परंपरा सुरू झाली.

टाळी वाजवण्याचं धार्मिक महत्व

असं मानलं जातं की, टाळी वाजवून तुम्ही देवाला तुमची गाऱ्हाणी ऐकायला बोलवतात. असं केल्याने देवाचं लक्ष वेधलं जातं. शिवाय आरती, भजन, किर्तन यावेळी टाळी वाजवल्याने पाप नाश होतात असं मानलं जातं. आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असे म्हणतात.

वैज्ञानिक महत्व

वैज्ञानिक कारण म्हणजे टाळी वाजवल्याने हाताच्या अॅक्युप्रेशर पॉइंट्स वर दाब पडतो. हृदय, फुफ्फूसासंबंधी रोगांमध्ये लाभ मिळतो. यामुळे ब्लड प्रेशर संतुलीत राहतं. याला एक प्रकारचा योग समजलं गेलं आहे. असं रोग केल्याने बऱ्याच रोगांपासून मुक्ती मिळते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

SCROLL FOR NEXT