Vaikuntha Chaturdashi 2022 esakal
संस्कृती

Vaikuntha Chaturdashi 2022 : वैकुंठ चतुर्दशीला 'या' कथा वाचल्याने मिळते १४ हजार पापांपासून मुक्ती

पुराणात वैकुंठ चतुर्दशीच्या तीन कहाण्या मिळतात. त्यांचे वाचन केल्यानं १४ हजार पापांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं.

सकाळ डिजिटल टीम

Vaikuntha Chaturdashi 2022 : हिंदू संस्कृतीनुसार कोणताही मुहूर्त हा सुर्योदयानुसार गृहित धरला जातो. त्यामुळेच काल ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.२८ ला वैकुंठ चतुर्दशीला सुरूवात झाली. तर आज सायंकाळी ४ वाजून १५ मिनीटांपर्यंत मुहूर्त असणार आहे.

या काळात पुराणातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या तीन कथा वाचाव्या असं सांगितलं जातं. ज्याविषयी सांगितलं जातं की, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी यांचं वाचन केल्यावर १४ हजार पापांचे कर्म दोष दूर होतात. या कथा तुमच्यासाठी इथे देत आहोत.

कथा १

एकदा नारद मुनी पृथ्वीलोक फिरून वैकुंठात जातात तिथे विष्णूदेव त्यांच्याकडे प्रसन्न मुद्रेने बघून इथे येण्याचं कारण विचारतात. त्यावर नारद मुनी म्हणतात, हे देवा जे भक्त तुम्हाला प्रिय असतात ते तरतात. पण सामान्य लोकांचं काय? त्यांच्यासाठी काहीतरी सोपा मार्ग सांगा.

यावर विष्णूदेव सांगतात, कार्तिक शुक्ल पक्षात चतुर्दशीला जे लोक या व्रताचं पालन करेल आणि श्रध्दा, भक्तीने पूजा अर्चना करेल त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं खुली होतील. या नंतर श्री विष्णूंनी जर विजयला बोलावून कार्तिक चतुर्दशीला स्वर्गाची दारं खुली ठेवण्याचा आदेश दिला. या दिवशी जो पण विष्णू देवाची पूजा नामःस्मरण करेल त्याला वैकुंठधाम प्राप्त होईल असं विष्णूंनी सांगितलं.

कथा २

पौराणिक कथेनुसार एकदा श्री विष्णू महादेवाची पूजा करण्यासाठी काशीला आले होते. तिथं मनकर्णिका घाटावर आंघोळ करून त्यांनी एक हजार स्वर्ण कमळ फुलांनी भगवान विश्वनाथाच्या पूजनाचा संकल्प केला. अभिषेकानंतर जेंव्हा ते पूजा करू लागले तर त्यांची परिक्षा घेण्यासाठी महादेवाने त्यांचं एक फूल कमी केलं. श्री विष्णूंना पूजा पूर्तीसाठी हजार फुलं वाहायची होती. एक फूल कमी असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी विचार केला मला कमलनयन, पुंडरीकाक्ष म्हणतात. म्हणजे माझे डोळेपण कमळासमान आहे. मग आता तेच मी अर्पण करतो.

त्यांची भक्ती बघून महादेव प्रट झाले. ते म्हणाले, हे विष्णू या जगात माझा तुझ्यासारखा दुसरा भक्त नाही. आजची ही कार्तिक शुक्ल चतुर्दशी आता वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी जो पहिले भागवान विष्णूची पूजा करेल त्याला वैकुंठ लोक प्राप्त होईल.

या वैकुंठ चतुर्दशीला शिवाने कोटी सुर्यप्रकाश असणारं सुदर्शन चक्र विष्णूंना प्रदान केलं. या दिवशी स्वर्गाची दारं खुली राहतील. जो हे व्रत मनापासून करेल त्याला वैकुंठधाम मिळेल.

कथा ३

धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण होता. तो फार वाईट वागायचा, अनेक पापं केली होती. एकदा तो गोदावरी नदीवर आंघोळीला गेला. त्या दिवशी अनेक भक्त पूजेसाठी घाटावर आलेले होते. त्यांच्यासोबत धनेश्वरही होता. ही वैकुंठ चतुर्दशी होती. या श्रध्दाळू लोकांमुळे धनेश्वरलापण पुण्य मिळालं. त्याचा मृत्यू झाल्यावर यमदेवाने त्याला नकरात टाकलं.

तेंव्हा श्री विष्णू तिथं आले आणि म्हणाले, याने खूप पापं केली आहेत. पण वैकुंठ चतुर्दशीला गोदावरी नदीत स्नान केलं. आणि तिथं आलेल्या अनेक श्रध्दाळूंच्या पुण्याने त्याचेपण सर्व पाप नष्ट झाले आहेत. आता त्याला वैकुंठ धाम मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT