World Coconut Day 2022 Esakal
संस्कृती

World Coconut Day 2022: हिंदु संस्कृती नारळ पूजेत का वापरतात? महिला का फोडत नाहीत?

नारळाला शास्त्रात श्रीफळ म्हणजेच देवी लक्ष्मीचे फळ असे म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नारळ हे फक्त फळ नाही. धार्मिक दृष्टीकोनातून त्यालादेखील जिवंत अस्तित्व आहे असे मानले जाते, त्याच्या संरचनेवरून देखील आपल्याला हे समजते. नारळालासुद्धा माणसासारखे दोन डोळे आणि तोंड असते. अमृत पाणी समजल्या जाणाऱ्या नारळाच्या तोंडाला छिद्र पाडूनच नारळातील पाणी काढले जाते.

नारळाला शास्त्रात श्रीफळ म्हणजेच देवी लक्ष्मीचे फळ असे म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येक पूजेत नारळाचा वापर महत्वाचा आहे. आज जागतिक नारळ दिन आहे त्यानिमित्ताने नारळाविषयी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

नारळाचे फुल खाल्याने संतती प्राप्त होते.

नारळाचे फुल खाल्याने शिवशंकराचा आशिर्वाद प्राप्त होतो आणि तुम्हाला मुल होते असा देखील लोकांचा समज आहे. नारळाचे फुल हे शिशुचे रुप मानले जाते. त्यांना संतती नाही अशा लोकांना संतती प्राप्त होते.

नारळ देवघरात का ठेवतात?

नारळ हे त्रिदेवाचे प्रतिक आहे म्हणुन ते देवघरात ठेवले जाते.देवघरात नारळ ठेवल्यामुळे सदैव आपल्या घरावर लक्ष्मी मातेचा कृपा आशिर्वाद राहतो. आपल्या वास्तुशास्त्र देखील नारळाला खुप महत्त्व आहे.

हिंदू धर्मात पूजा, यज्ञ, हवन इत्यादींमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. हवनात नारळ अर्पण केला जातो. नारळ वाटून प्रसाद म्हणून खाल्ला जातो. मानले जाते की भगवान विष्णूने देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ यांना सोबत या जगात आणले होते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. मानले जाते की नारळ इच्छा पूर्ण होण्यास मदत करतो.

आता बघू या नारळाविषयी प्रचलित आख्यायिका काय आहे?

पौराणिक कथेनुसार महर्षी विश्वामित्रांनी इंद्रदेवावर रागवून वेगळा स्वर्ग निर्माण केला. त्या स्वर्गाच्या निर्मितीवर त्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा विचार केला. सर्वप्रथम त्यांनी मानवी स्वरूपात नारळ निर्माण केले. त्यामुळे नारळालाही मानवी रूप मानले जाते.

हिंदु धर्मातील प्रत्येक पूजेच्या वेळी नारळाला इतके महत्त्व का असते?

पूर्वी कर्मकांड, हवन इत्यादींमध्ये त्यागाची प्रथा होती. बलिदान एकतर स्वतःसाठी किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी केले जायचे. हळुहळु ही पद्धत बदलली आणि ती पशुबळी पुरती मर्यादित झाली. नंतर बुद्धीवादी आणि कर्मकांडवादी ब्राह्मणांच्या मदतीने यावर उपाय काढण्यात आला तो असा होता की देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी नारळाचा बळी दिला तर तो मनुष्य रुपी असतो.

आता बघू या महिला किंवा मुली या नारळ का फोडत नाहीत?

नारळ हे बीज फळ आहे. स्त्री बीजाच्या रूपात मुलाला जन्म देते. म्हणून, नारळ गर्भधारणेशी संबंधित इच्छा पूर्ण करण्यास सक्षम मानला जातो. यामुळेच महिलांसाठी नारळ फोडणे निषिद्ध मानले जाते. मानले जाते की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिच्या मुलाला त्रास होतो.


आपल्या दैनंदिन जिवनात नारळाचा उपयोग कुठे कुठे होतो ?

नारळाला कल्पवृक्ष देखील मानले जाते कारण नारळ हे अनेक रोगांवर औषध म्हणून गुणकारी आहे. नारळ हे उर्जेचे द्योतक आहे आणि त्याचा अनेक प्रकारे वापर केला जातो. नारळाचे फळ, त्याची पाने आणि अगदी केसही विविध प्रकारे वापरले जातात. त्यामुळे नारळ हे धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय पवित्र मानले जाते आणि पूजेत नारळाचा वापर केला जातो.

आता बघू या एकाक्षी नारळाचे फायदे:

● असे मानले जाते की जो एकाक्षी नारळ ज्याच्याकडे असतो, त्याला कायम संपत्ती, ऐश्वर्य आणि सर्व प्रकारचे सुख मिळते.

● ज्या घरात पूजा केलेला एकाक्षी नारळ असेल, त्या घरातील सदस्यांवर कोणत्याही प्रकारच्या तंत्र-मंत्र, युक्त्या इत्यादींचा प्रभाव पडत नाही.

● जर एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला भूताने झपाटले असेल तर त्याच्या मांडीवर एकाक्षी नारळ ठेवल्याने तो अशा सर्व अडथळ्यांपासून मुक्त होतो. तसेच जर तुम्ही एकाक्षी नारळावर चंदन, केशर, रोली मिसळून त्याचा टिळा कपाळावर लावला तर तुम्हाला एका विशिष्ट कार्यात नक्कीच यश मिळते.

● जर तुम्हाला कोर्ट-संबंधित प्रकरणांमध्ये विजय मिळवायचा असेल, तर रविवारी, विरोधकाचे नाव घेतल्यानंतर, एकाक्षी नारळावर लाल कणेरचे फूल ठेवा आणि ज्या दिवशी तुम्हाला न्यायालयात जायचे असेल त्या दिवशी ते फूल तुमच्यासोबत घ्या. त्यामुळे संपूर्ण परिस्थिती त्याच्या बाजूने होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT