2013 Muzaffarnagar riots Yogi Adityanath led UP government commences process to withdraw 131 riot cases
2013 Muzaffarnagar riots Yogi Adityanath led UP government commences process to withdraw 131 riot cases 
देश

मुझफ्फरनगरच्या दंगलखोरांना योगी सरकार 'माफ करणार' !

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि शामली येथे झालेल्या दंगलीनंतर अनेक हिंदूंवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यवाही सुरु केली आहे. या दंगलीदरम्यान दाखल झालेले 131 खटले मागे घेण्यात येणार आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये 2013 भडकलेल्या जातीय दंगलीदरम्यान अनेक हिंदूंवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 13 हत्या आणि 11 हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. हिंदू-मुस्लिम जातीय दंगलीत 62 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ही दंगल सप्टेंबर 2017 मध्ये झाली. त्यादरम्यान दंगल घडविणाऱ्या सर्वांविरोधात भारतीय दंडविधान कलम 153 ए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या दंगलीदरम्यान गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सर्वांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. 

तसेच फेब्रुवारी महिन्यात मुझफ्फरनगर आणि शामलीचे खाप नेते भाजप खासदार संजीव कल्याण यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुझफ्फरनगर दंगलीदरम्यान दाखल झालेले 402 खोटे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती. या सर्वांच्या विनंतीनुसार योगी आदित्यनाथ यांनी गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरु केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT