Narendra Modi, Rahul Gandhi, mamata banerjee 
देश

Mamata Banerjee : विरोधकांच्या ऐक्याला धक्का! 2024 लोकसभा निवडणुकीबाबत ममतांचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने टीएमसीचा पराभव करून नवा इतिहास रचला आहे. तब्बल दहा वर्षांनंतर सागरदिघी मतदारसंघातून टीएमसी बाहेर पडली आहे. काँग्रेसचे उमेदवार बायरन बिस्वास यांनी टीएमसीचे देबाशीष बॅनर्जी यांचा २२ हजार मतांनी पराभव केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या विजयामुळे नाराज आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तृणमूल काँग्रेस 2024ची निवडणूक एकट्याने लढणार आहे.

सागरदिघी पोटनिवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांचे मोठे विधान गुरुवारी समोर आले. काँग्रेसचा विजय अनैतिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तृणमूलला पराभूत करण्यासाठी माकपसह काँग्रेस पक्षाने भाजपशी करार केला, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

दरम्यान पोटनिवडणुकीतील पराभवासाठी आपण कोणालाही जबाबदार धरत नाहीत. मात्र आम्हाला पराभूत करण्यासाठी एक अनैतिक युती झाली होती, असंही ममता यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT