liquor
liquor 
देश

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने चौघांचा मृत्यू

वृत्तसंस्था

बेगुसराय : बिहारमध्ये दारुबंदी असतानाच बेगुसराय जिल्ह्यातील पोखारिया गावात विषारी दारू प्यायल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बिहार सरकारने राज्यात दारु बंदी केलेली आहे. तरीही दारूची सर्रास विक्री होत असल्याचे पहायला मिळत आहे. रविवारी रात्री बेगुसराय जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेत मृत्यू झालेले चौघेही मित्र होते. रविवारी रात्री स्टेडियमध्ये दारू पिल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले.

मृत्यू झालेल्या चौघांपैकी मनोज पासवान हा नेहमी दारुचे सेवन करणारा होता. तर, सोनू कुमार, सोनी कुमार आणि प्रवीण कुमार यांनीही त्याच्यासोबत दारु प्यायली. या घटनेची चौकशी करण्यात येत असून, दारु विक्रेत्यांवर छापे टाकण्यात येत आहेत. या घटनेमुळे बिहारमध्ये 2016 मध्ये हूच घटनेची आठवण झाली. हुच येथेही विषारी दारु प्यायल्याने चौघांचा मृत्यू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT