MGNREGA 
देश

'मनरेगा'त ९३५ कोटींचा गैरव्यवहार; काँग्रेसचा केंद्रावर निशाणा

भ्रष्टाचार रोखण्यात मोदी सरकार अपयशी

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात 'मनरेगा' योजनेत गेल्या चार वर्षात तब्बल ९३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल केंद्र सरकारला जबाबदार धरले पाहिजे, असंही काँग्रेसनं म्हटलं आहे. पीटीआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले, "ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सार्वजनिक माहितीतून हे समोर आलंय की, गेल्या चार वर्षांपासून मनरेगा योजनेत ९३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. मंत्रालयाच्या ऑडिटमधून ही बाब उघड झाली आहे."

खेरा म्हणाले की, सामाजिक लेखापरिक्षण युनिटचा महत्त्वपूर्ण परिणाम असा होता की बहुतेक प्रकरणांमध्ये गैरव्यवहाराचा प्राथमिक प्रकार हा 'आर्थिक गैरव्यवहार' होता. हे केवळ लाचखोरीपुरतं मर्यादित नाही तर अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींना आणि विक्रेत्यांना फुगवलेल्या खरेदी किंमतींवर पेमेंट समाविष्ट आहे. तसेच या गैरव्यवहारात उत्तरदायित्वाचा अभाव आणि नरेंद्र मोदी सरकारच्या योग्य परिश्रमाचा पुरावा आहे, असा खोचक टोलाही काँग्रेस नेत्याने केला आहे.

"आम्ही भारत सरकारकडे मागणी करतो की, गैरव्यवहार केलेली रक्कम लवकरात लवकर वसूल करावी. तसेच या वसुलीच्या पैशांचा वापर गरीब आणि उपेक्षित व्यक्तींना भरपाईसाठी करावा, ज्यांना कोविड19 च्या काळात खूप त्रास झाला आहे," अशी मागणीही यावेळी काँग्रेसने केली.

तामिळनाडूत सर्वाधिक गैरव्यवहार

दरम्यान, तामिळनाडूमध्ये सन 2017-18 ते सन 2020-21 दरम्यान सर्वाधिक 245 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा दावा खेरा यांनी केला. तसेच बिहारमध्ये 12.34 कोटी रुपयांचा गैरव्यवहार, झारखंड जिथं त्यावेळी भाजपचं शासन होतं, 51.29 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा दावा खेरा यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT