95 children illegally being taken to Bihar from UP rescued in Ayodhya  Esakal
देश

अयोध्येत बसमधून ९५ बालकांची CWC ने केली सुटका, सर्व मुलं ५ ते ९ वयोगटातील

अयोध्येत बाल कल्याण संस्थेने बसमधून नेत असणाऱ्या ९५ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये अशी अनेक मुले आहेत ज्यांना पालक नाहीत. या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठा घोटाळा आणि फसवणूक झाल्याचे बाल कल्याण समितीचे म्हणणे आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बिहारमधील अररिया येथून बाल कल्याण समितीने बसमधून नेत असणाऱ्या 93 मुलांची सुटका केली आहे, त्या मुलांचे वय 5 ते 9 वर्षे आहे, या मुलांना अयोध्येतील सहारनपूर येथे नेण्यात येत होते. अयोध्येतील देवकाली चौकाजवळ बसमधून बालकल्याण समितीच्या लोकांनी या लहान बालकांची सुटका केली आहे.

जनावरासारखी मुलं एका बसमध्ये भरलेली होती. ही मुले गरीब कुटुंबातील आहेत. यामधील काही मुलांना आई-वडील नाहीत. यातील अनेक मुलांची आधारकार्डे देखील बनावट असू शकतात, असे बालकल्याण समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. यामागे मोठा हात असण्याची शक्यता आहे.

आता सापडलेल्या मुलांचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे बाल कल्याण समिती सदस्या सुनीता यादव यांनी सांगितले. मुले एकमेकांचे भाऊ आहेत की, एकाच भागातील आहेत किंवा वस्तीतील आहेत हे त्यांना माहीत नाही. ते चुकीचा पत्ता सांगत असल्याचेही समोर आले आहे. आधार कार्ड तपासले असता त्यांना आपल्या जिल्ह्याचे नावही सांगता आले नाही. ही मुले मदरशात नेली जात होती. आपण कुठे जात आहोत याची मुलांना कल्पना नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मौलवीचा फोन आला त्यानी सांगितले होते म्हणून आईने पाठवले असे काही मुलांचे म्हणणे आहे. मौलवी काही मुलांना त्यांच्या घरातून घेऊन आला होता. त्याना घरातून उचलून, बसमध्ये बसवले, तर काही मुलांच्या घरी त्यांनी मुलांना पाठवायला सांगितले, म्हणून पाठवण्यात आले होते. मुलांना कुठे नेण्यात येत आहे याची माहीत आहे का, असे विचारले, तर त्यांनी सांगितले की, त्यांना काहीच माहिती नाही, मौलवीने फोन केला होता, त्यानंतर आईने पाठवले.

मुलांना त्यांच्या घराचा पत्ता देखील माहिती नसल्याची माहिती आहे. मूल वेगळा पत्ता सांगत आहेत तर त्यांच्या आधार कार्डावर वेगळाच पत्ता लिहलेला आहे. मुलांना मदरशाचे नावही माहीत नाही. आधार कार्डही बनावट बनवले असण्याची शक्यता आहे. समुपदेशन करताना मुलांना त्यांचा पत्ताही सांगता येत नाही. जो व्यक्ती मुलांना घेऊन जात होता, ती मुले आमच्यासोबत असल्याचे सांगत आहे. तर मुलांना विचारले असता त्यांनी त्या व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगितले.

बालकल्याण समितीचे अध्यक्ष काय म्हणाले?

बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनी सांगितले की, बिहारमधील अररिया येथून सहारनपूरला बेकायदेशीरपणे मुलांना आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर तातडीने कारवाई करत आम्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पकडलेल्या लोकांना या मुलांच्या पालकांचे कोणतेही वितरण पत्र मिळालेले नाही. यामध्ये पालक नसलेल्या अनेक मुलांचाही समावेश आहे. मुलांना सध्या शेल्टर होममध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. उर्वरित कारवाई सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar industry: साखर कोणी खाईना, खपात घसरण; मार्चचा ५० टक्के कोटा पडून; एप्रिलमध्येही विक्रीचे ‘चॅलेंज’, उद्योगासमोर दुहेरी संकट!

Vidarbha News:शासकीय कार्यालये की मृत्यूचे सापळे? ; ९५ टक्के इमारती धोकादायक; कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ

Vidarbha News: रस्त्यांची दयनीय स्थिती; विकासकामांसाठी प्रतीक्षाच; हलबीटोला मार्गासह मुख्य रस्ते जीर्ण; अपघाताचा धोका वाढला

Amravati News: सेंट्रल बँकेत तीन कोटींचा अपहार; न केलेल्या कामाचे देयके काढून पैसा खिशात

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं! दोन एकर जमिनीसाठी सख्ख्या भावासह वडिलांचा कुऱ्हाड-खोऱ्याने खून; हिंगणगावात विहिरीशेजारी नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT