Aap Leader Sanjay Singh esakal
देश

'अग्निवीर बनवत आहात की जातीवीर', आप खासदाराचा मोदी सरकारवर हल्लाबोल

'मोदी सरकारचा गरीब चेहरा आता देशासमोर आला आहे.'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनी अग्निपथ योजनेवरुन (Agneepath Scheme) केंद्र सरकारवर (Central Government) पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत. स्क्रिनशॉट शेअर करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 'लष्कर भरती'मध्ये जात विचारली जात आहे, असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केलाय.

संजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, "मोदी सरकारचा गरीब चेहरा आता देशासमोर आलाय. मोदीजी दलित/मागास/आदिवासींना सैन्य भरतीसाठी पात्र मानत नाहीत का? असा सवाल करत ते म्हणाले, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 'लष्कर भरती'मध्ये जात विचारली जात आहे. मोदीजी, तुम्ही देशात 'अग्निवीर बनवत आहात की जातीवीर', असा घणाघात त्यांनी केलाय. संजय सिंह यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, उमेदवाराकडं जात आणि धर्माचं प्रमाणपत्र मागण्यात आलंय.

संजय सिंह यांच्या आरोपांवर भाजपनंही प्रत्युत्तर दिलंय. भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली म्हणाले, 'विरोधकांना मोदीविरोधाची सवय झालीय. त्यामुळं ते असे आरोप करत सुटले आहेत.' जून महिन्यात सैन्यात भरतीसाठी अग्निपथ योजना आणलीय. या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना चार वर्षांसाठी अग्निवीर म्हणून संबोधलं जाईल. चार वर्षे पूर्ण झाल्यावर हे अग्निवीर आपापल्या क्षेत्रात करिअर करु शकतात. मात्र, या योजनेला प्रचंड विरोध होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT