accident to vehicle returning from Tirupati Balaji darshan 5 devotees killed on spot police Sakal
देश

Accident News : तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या वाहनाला अपघात; पाच भाविक जागीच ठार

आकरा जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक

अमृत वेताळ

आंध्रप्रदेश, बेळगाव : तिरुपती बालाजीचे दर्शन घेवून परतणाऱ्या भावीकांच्या क्रुझर वाहनाने लॉरीला मागुन जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात पाच भावीक जागीच ठार झाले. मृतापैकी चौघेजण बडची गावातील (ता. अथणी जि. बेळगाव) एकाच कुंटुबातील आहेत. तर पाचव्या मृताचा पत्ता शोधण्याचे काम सुरु आहे. शुक्रवार (ता.१५) सकाळी आंध्रप्रदेशातील अनमय जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. आकरा जण गंभीर जखमी झाले आहेत.

हनुमंता आजुर (वय ५२), महानंदा आजुर (वय ४६), शोभा आजुर (वय ३६), अंबीका आजुर (वय १९ चौघेही रा. बडची ता. अथणी जि. बेळगाव), मनमंथ जाधव (वय ५२) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. आकरा जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील १६ भाविक क्रुझर वाहनातून तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होते.

यावेळी भरधाव क्रुझरने लॉरीला मागुन धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातातील जखमींना तिरुपती रोवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचा धोका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT