देश

अफगाणमधील भारतीयांना बाहेर काढू; राजदूत गुजरातला परतले

सकाळ डिजिटल टीम

गुजरातच्या जामनगर इथं भारताचे राजदूत अफगाणिस्तानमधून पोहोचले. त्यांनी भारतीय हवाई दलाचे आभार मानले आहेत.

नवी दिल्ली - तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर भारताचे राजदूत तिथून परत आले आहेत. रुद्रेंद्र टंडन यांनी म्हटलं की,'अफगाणिस्तानमधील वातावरण वेगाने बदलत आहे.' मंगळवारी सकाळी गुजरातच्या जामनगर इथं रुद्रेंद टंडन पोहोचले. त्यांनी भारतीय हवाई दलाचे आभार मानले आहेत. तसंच ते म्हणाले की, अजुन अफगाणिस्तानमध्ये काही भारतीय आहेत. तिथल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. एअर इंडियाचे विमान उड्डाण सुरु राहणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली.

जामनगर इथं पोहोचल्यानंतर भारताचे राजदूत टंडन यांनी सांगितलं की, असं नाही की आम्ही अफगाणिस्तानमध्ये लोकांना सोडून दिलं आहे. त्यांचे हित आणि त्यांच्यासोबतचं नातं आम्हाला माहिती आहे. आम्ही सातत्यानं त्यांच्या त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या तिथली परिस्थिती कशी बदलत आहे हे मी सांगू शकत नाही असे ते म्हणाले. काबुलमधील भारतीय दुतावासातून कर्मचाऱ्यांना बाहेर काढणं सोपं नव्हतं अशीही माहिती समोर आली आहे.

टंडन म्हणाले की, आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितवर लक्ष ठेवून आहे, कारण अजुनही तिथे काही भारतीय आहेत. जोपर्यंत काबुलचे विमानतळ सुरु असणार आहे तोपर्यंत एअर इंडिया त्यांची सेवा देणार आहे. विमानतळाची परिस्थिती पाहता एअर इंडियाने त्यांची विमान उड्डाणे बंद केली होती. मात्र अद्याप तिथे अडकलेल्या लोकांना कसे परत आणता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्प डेस्कसुद्धा सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT