Rahul Gandhi Sakal.jpg 
देश

फेसबुकनंतर व्हॉट्सॲपशी देखील भाजपची हातमिळवणी - राहुल गांधी  

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर भाजपशी लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांना प्रतिबंध करण्यासाठी द्वेषमूलक विधानविरोधी नियमांचा अवलंब करण्यात आला की नाही अशी विचारणा देखील काँग्रेसकडून करण्यात आली आहे. 

मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील द वॉल स्ट्रीट जर्नलने भाजप आणि फेसबुक इंडिया यांच्या भूमिकेवर प्रशचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर या वृत्तामुळे भारतातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. परंतु फेसबुकने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे हे प्रकरण निवळल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच, आता राहुल गांधी यांनी सोशल मीडियातील व्हॉट्सॲपवर भाजपचे नियंत्रण असल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर आरोप करताना, टाइम या नियतकालिकाने दिलेल्या वृत्ताचा दाखला दिला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या ट्विट मध्ये, अमेरिकेच्या टाइम या नियतकालिकाने व्हॉट्सॲप आणि भाजप यांचे लागेबांधे उघड केल्याचे म्हटले आहे. तसेच भारतात चाळीस कोटी लोक व्हॉट्सॲप वापरतात. आणि व्हॉट्सॲप देशात पेमेंट सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे, त्यासाठी त्यांना मोदी सरकारची मंजुरी लागेल. त्यामुळे यावरूनच कंपनीवरील भाजपचे नियंत्रण स्पष्ट होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

तर, फेसबुक आणि व्हॉट्सॲप याप्रकरणाचा सखोल तपास करण्यसाठी फेसबुककडून नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? व त्याकरिता कायदेशीर कारवाईसाठी काही पाऊले उचलली जात आहेत का? अशी विचारणा काँग्रेस पक्षाकडून झुकेरबर्ग यांना पाठवलेल्या पत्रात करण्यात आली आहे. तसेच खासगी लाभासाठी एखादी परकीय कंपनी सामाजिक सौहार्दाला क्षती पोचवू शकत नाही असे देखील काँग्रेसने आपल्या पत्रात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुधा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

Amboli Ghat Accident: 'आंबोली घाटामध्ये टेम्पो दरीत कोसळला'; ब्रेक निकामी झाल्याने दुर्घटना, चालक सुखरूप

Nashik Central Jail : नाशिक कारागृहात 'ॲलन कार्ड' घोटाळा: शिपाई आणि बंदीविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT