देश

कोरोनामुळे हरवलं आई-वडिलांचं छत्र; मोठा भाऊ झाला 'बापमाणूस'

शर्वरी जोशी

कोरोनामुळे (covid) देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेक घर उद्धवस्त झाली. असंख्य लहान मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचं छत्र हरपलं. त्यामुळे सध्याच्या काळात कोरोनामुळे अनाथ झालेली अनेक मुलं पाहायला मिळत आहेत. या अनाथ मुलांसाठी शासनाकडून काही उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र, हसतं-खेळतं कुटुंब उद्धवस्त झाल्यामुळे त्याचा परिणाम थेट मुलांच्या बालमनावर होतांना दिसत आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधील तीन लहान भावंडांची चर्चा रंगली आहे. आई-वडिलांना गमावल्यानंतर एका १३ वर्षाचा मुलगा आपल्या लहान भावंडांसाठी बापमाणूस झाला आहे. विशेष म्हणजे मोठं दु:ख पचवून तो त्याच्या भावंडांची काळजी घेत आहे. (after-losing-parents-to-covid-boy-wants-to-raise-his-siblings)

उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या शामलीमधील लिसाढ या गावातील एका कुटुंबावर कोरोनाने घाला घातला आहे. एकाच वेळी या कुटुंबातील चार वडीलधाऱ्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या घरात फक्त ३ लहान मुलेच राहिली आहेत. विशेष म्हणजे केवळ १३ वर्षांच्या मुलावर आता संपूर्ण घराची जबाबदारी आली आहे. हा एकमेव लहान मुलगा त्याच्या अन्य १२ आणि ११ वर्षांच्या भावंडांना सांभाळत आहे.

लिसाढ येथे राहणाऱ्या लोकेद्र मलिक (४०) या शेतकऱ्याचा कोरोनाच्या पहिल्याच लाटेत मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी व आई-वडिलांचेही कोरोनामुळे निधन झालं. घरातील चारही वडीलधारी मंडळी गमावल्यानंतर या घरातील जबाबदारी समरप्रीत (१३) या मुलावर आली आहे. समरप्रीत सध्या मीना(१२) आणि शंकर (११) या आपल्या लहान भावंडांना सांभाळत आहे. विशेष म्हणजे या परिस्थितीतही समरप्रीत डगमगला नसून आई-वडिलांचं छत्र हरपल्यानंतर मी माझ्या भावंडांचा सांभाळ करेन, अशी ठाम भूमिका त्याने घेतली आहे.

दरम्यान, या लहान मुलांना सरकारी योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाणार आहे. तसंच वारंवार या मुलांवर स्थानिक प्रशासनाचं लक्ष असेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच, या मुलांचे अन्य नातेवाईकदेखील त्यांची चौकशी करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT