PM Narendra Modi message to youth without naming the Agneepath scheme
PM Narendra Modi message to youth without naming the Agneepath scheme PM Narendra Modi message to youth without naming the Agneepath scheme
देश

अग्निपथ वाद : योजनेचे नाव न घेता PM मोदींनी दिला संदेश; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ (Agneepath) योजनेवरून देशात वाद सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शने व जाळपोळही झाली. या योजनेवरून पंतप्रधानांवरही टीका करण्यात आली. असे असताना बेंगळुरूला पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेचे नाव न घेता तरुणांना मोठा संदेश दिला आहे. आठ वर्षांत केंद्र सरकारने अंतराळ व संरक्षण क्षेत्र तरुणांसाठी खुले केल्याचे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. (PM Narendra Modi message to youth without naming the Agneepath scheme)

केवळ सुधारणेचा मार्गच नवीन ध्येयांकडे घेऊन जाऊ शकतो. अनेक दशकांपासून सरकारची मक्तेदारी असलेली संरक्षण आणि अवकाश क्षेत्रे आम्ही तरुणांसाठी खुली केली आहेत. ड्रोनपासून ते इतर तंत्रज्ञानापर्यंत आम्ही तरुणांना काम करण्याची संधी देत ​​आहोत. सरकारने जे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान निर्माण केले आहे. त्यासाठी तरुणांनी कल्पना व इनपुट द्यावेत, असे आम्ही तरुणांना सांगत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

उपक्रम सरकारी असो की खाजगी दोन्ही देशाची संपत्ती आहे. त्यामुळे समतल खेळाचे क्षेत्र सर्वांना समान द्यायला हवे यावरही नरेंद्र मोदी यांनी भर दिला. मागच्या आठ वर्षांत १०० अब्ज डॉलरहून अधिक कंपन्या निर्माण झाल्या आहेत. ज्यामध्ये दर महिन्याला नवीन कंपन्या जुडत आहेत. भारत स्टार्ट अप्सच्या जगात वेगाने काम करीत आहे. आतापर्यंत हजारो कोटींचा व्यवसाय केला आहे, असेही नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

मोदींनी सुमारे २७ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांना ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यांनी बेंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली. तसेच बीआर आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (BASE) उद्घाटन केले.

दुहेरी इंजिनचे सरकार रेल्वे, रस्ता, मेट्रो, अंडरपास, उड्डाणपूल, बेंगळुरूमधील जामपासून सुटका करण्यासाठी सर्व शक्य मार्गांवर काम करीत आहे. आमचे सरकार बंगळुरूच्या उपनगरी भागांना चांगल्या कनेक्टिव्हिटीने जोडण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले.

काही निर्णय सुरुवातीला वाईट वाटतात; मात्र...

काही निर्णय सुरुवातीला वाईट वाटतात. परंतु, त्याचा देशाला दीर्घकाळ फायदा होतो. हे निर्णय राष्ट्र उभारणीत मदत करतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरू येथील कार्यक्रमात म्हणाले. बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, मध्यप्रदेशसह देशातील अनेक राज्यांतील युवक या योजनेच्या विरोधात निदर्शने करीत आहेत, हे विशेष...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT