नवी दिल्लीः भारताच्या सगळ्यात शक्तिशाली 'अग्नी-५' या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी झाली. पाच ते साडेपाच हजार किलोमीटरपर्यंत लक्ष्य भेदण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे.
भारताने हे क्षेपणास्त्र डागलं तर जगामध्ये हाहाःकार माजेल. पूर्ण आशिया खंड, युरोपचा काही भाग, युक्रेन, रशिया, जपान ते इंडोनेशियापर्यंत मारा करणं भारताला शक्य होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एमआयआरव्ही हे तंत्रज्ञान या मिसाईलमध्ये वापरण्यात आलेलं आहे. त्यामुळे मिसाईलच्या वरच्या भागात बसवल्या जाणाऱ्या वॉरहेडची संख्या वाढवता येणार आहे. त्याने एक मिसाईल एकावेळी निरनिराळ्या लक्ष्यांना भेदू शकेल.
शक्तिशाली क्षेपणास्त्र
अग्नी-५ या क्षेपणास्त्राचं वजन ५० हजार किलोग्रॅम आहे. याची लांबी १७.५ मीटर तर व्यास २ मीटर म्हणजे ६.७ फूट आहे. या मिसाईलच्या वरच्या भागावर १ हजार ५०० किलोग्रॅमच्या वजनाचं अण्विक अस्त्र लाँच करता येईल. यामध्ये तीन स्तरावरील रॉकेट बुस्टर आहेत. याचा वेग ध्वनीवेगाच्या २४ पट अधिक आहे. म्हणजे एका सेकंदात ८.१६ किलोमीटरचं अंतर पार करणं या क्षेपणास्त्राला शक्य आहे.
आवाक् करणारा वेग
अग्नी-५ मिसाईल २९ हजार ४०१ प्रतितास किलोमीटरच्या वेगाने शत्रुवर हल्ला करु शकतं. यामध्ये जीपीएस, रिंग लेजर गायरोस्कोप इनर्शियल नेविगेशन सिस्टिम आणि सॅटेलाईट गाईडन्स सिस्टिम आहे. त्यामुळे एका झटक्यात शत्रुला लक्ष्य करण्याची याची क्षमता आहे. जर टार्गेट जागेवरुन १० ते ८० मीटर सरकलं तरीही त्याचं वाचणं अवघड आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.