Narendra-Modi sakal
देश

कृषी कायद्यांवर बुधवारी ‘अधिकृत’ फुली?

सरकारच्या सूत्रांनुसार मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर याबाबतचे विधेयक २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडून ते मंजूर करून घेतले जाईल.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेनंतरही शेतकरी संघटनांनी संसदेत कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी (ता. २४) केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत कायदे या प्रस्तावाला औपचारिक मंजुरी देण्यात येईल, असे संकेत दिले.

सरकारच्या सूत्रांनुसार मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर याबाबतचे विधेयक २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडून ते मंजूर करून घेतले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीदिनी सकाळी देशाला उद्देशून भाषण करताना हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी आणले असल्याचा दावा करताना मोदींनी या कायद्यांबाबत प्रयत्न करूनही काही शेतकऱ्यांना समजावता आले नसल्याची कबुली दिली होती.

तसेच आपल्या तपश्चर्येमध्ये काही तरी त्रुटी राहिली असावी ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशासारखे सत्य शेतकरी बांधवांना समजावू शकलो नाही, असे विधानही मोदी यांनी केले होते. मात्र, ही घोषणा करताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन झाले नसल्याची राजकीय पक्षांकडून टीका सुरू झाली होती. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदींना लक्ष्य करताना, ही घोषणा करण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली होती काय, असा सवाल केला होता.

दुसरीकडे, संयुक्त किसान मोर्चाने कायदे पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलनाच्या कार्यक्रमांमध्ये कोणताही बदल न करण्याचे आधीच जाहीर केले आहे. शिवाय लखिमपूर खिरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढविण्याचीही रणनीती आखली आहे.

यानुसार उद्या (ता. २२) लखनौ येथे संयुक्त किसान मोर्चाचे नेते सभा घेणार आहेत. तर २६ नोव्हेंबरला शेतकरी आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात कार्यक्रम घेतले जाणार असून २९ नोव्हेंबरला संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेवर ट्रॅक्टर मोर्चाही काढला जाणार आहे.

राहुल गांधींचा टोला

शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरूच ठेवण्याच्या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींना टोला चिमटा लगावण्याची संधी साधली. खोटी आश्वासने (जुमले) झेलणारी जनता पंतप्रधानांच्या सांगण्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. शेतकऱ्यांचा सत्याग्रह सुरू आहे, असे खोचक ट्विट राहुल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील १० रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार; पण कोणत्या आणि सुविधा काय असणार? जाणून घ्या...

T20 World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होणार; सूर्यकुमार यादवची टीम बघा कोणत्या तारखेला शेजाऱ्यांना परत हरवणार

सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन आणि दाढी... राजकुमार रावला नक्की काय झालय? Viral Video

Latest Marathi News Update : 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट,तक्रारदार संदीप पाटील यांचे पोलिसांवरच गंभीर आरोप

Horscope : उद्या 17 फेब्रुवारी! मंगळ देवाच्या कृपेने 3 राशींचे नशीब बदलणार; लगेच सुरू होतोय धनयोग, आरोग्याची मोठी समस्या संपणार

SCROLL FOR NEXT